या उद्घाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम ह्या लाभल्या होत्या. तर उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून नांदेड येथील सायन्स कॉलेजच्या रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. ए. टी. शिंदे हे उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून सरसम येथील सरपंच सौ काशिबाई सखाराम ठाकूर, उपसरपंच ॲड. अतुल वानखेडे, सरसम येथील युवा अभिनेता नरन देशमुख, स्टाफ सेक्रेटरी डॉ. डी. के. कदम, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे, सहकार्यमाधिकारी डॉ. एल.बी. डोंगरे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र भोगे, तंटामुक्ती अध्यक्ष सीमा ताई गोखले, ग्रा. पं. सदस्य नामदेव मोकासवार, कपिल कांबळे आदी उपस्थित होते.
यानंतर ॲड. अतुल वानखेडे, डॉ. डी. के. कदम, तंटामुक्ती अध्यक्ष सीमा ताई, अभिनेता नरन देशमुख आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम यांनी आपल्या ओजपूर्ण वाणीतून अनेक उदाहरणांसह केला.
कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. वसंतराव कदम यांनी केले. तर आभार रासेयो चे सहकार्यक्रमाधिकारी डॉ. एल. बी. डोंगरे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका व तसेच कार्यालयीन कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. सदरील कार्यक्रम हा कोविड-19 विषयी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून घेण्यात आला.