वाचन संस्कृतीचे बदलते स्वरूप -NNL


एकविसावे शतक परिवर्तनाचे शतक असे म्हटले जाते. यात प्रत्येकाच्या  कामाच्या स्वरूपात त्याच्या राहणीमानात बदल घडून येत आहेत. प्रत्येकाच्या  आवडी निवडीमध्ये बदल होणे स्वाभाविक आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे  माणसाची वाचनाची आवड कमी होत आहे. याला केवळ टिव्ही वाहिन्याचा, सोशल मिडीया प्रकर्षाने कारणीभूत दिसतो. 

एकीकडे तरूणांना परिक्षेला नेमूण दिलेली पुस्तके वाचण्याचासुध्दा कंटाळा येतो तर दुसरीकडे मात्र व्यक्तिमत्व विकास, करिअरशी संबंधित वाचक वर्ग वाढतो आहे .याचा अर्थ असा की वाचन संस्कृती बदलते आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात आवश्यक असणारी पुस्तके विकत घेतली जातात.  करिअर ओरियटेड पुस्तकांचा ओढा हा तरुण पिढीला आकर्षित करीत आहे. एखादी  कांदबरी किंवा कथाचे पुस्तक विकत घेतल्यास ते एकदा वाचून झाल्यानंतर पुन्हा वाचनाची आवड होत नाही तर पाककला, स्वास्थ संवर्धन, मनाची एकाग्रता हे पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरताना दिसतात. 

तरुणांचा ओढा एखाद्या जीमला जाण्याकडे ज्याप्रमाणे आहे, तो ओढा वाचनाच्या सवयीकडे दिसत नाही. वाचकांना विविध पर्याय उपलब्ध आहेत. एखादे आवडीचे पुस्तक नेहमीसाठी जवळ राहावे म्हणून आर्वजून विकत घेवून त्यांची साठवणूक करण्याचा एक विशिष्ट वर्ग आहे. यामुळे पूर्वीपेक्षा आज पुस्तके विकत घेण्याचे प्रमाण वाढले असल्याचे पुस्तक विक्रेते सांगतात. 

भारतामध्ये साधारण 10 तासामध्ये 42 मिनिटे लोक वाचतात असे एक सर्वेक्षणावरून निदर्शणास आले आहे. वाचन वर्ग वाढविण्यासाठी घरपोच ग्रंथालय हा उपक्रम पुणे येथे सुरू करण्यात आला आहे. पुस्तके घरपोच उपलब्‍ध होत असल्याने वाचकांना ग्रंथालयात जाऊन पुस्तक घेवून येण्याचा त्रास कमी झाला. यामुळे घरपोच पुस्तके उपलब्ध झाल्याने वाचकवर्ग वाढण्यास मदत होताना दिसते. 

सोशल मीडियाचा वाढता प्रभाव

सोशल मीडियाचा वाढता प्रभाव जनमानसावर मोठ्या प्रमाणात झालेला आहे. माहितीचे सर्व साधने सोशल मीडियावर उपलब्ध असल्याने ट्विटर, फेसबुक, इस्टाग्राम, युट्युब या सर्व साधणावर माहिती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. यामुळे आजचा तरूण वर्ग आपली वाचनाची आवड मोबईलव्दारे पूर्ण करू लागला आहे. 

देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या 15 ऑक्टोबर हा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे लेखन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार करण्याची दूरदृष्टी, शक्तीशाली कृती करण्याची प्रेरणा आणि चेतना देण्याचे काम करीत आहेत. मुळातच विद्यार्थ्यांमध्ये व समाजाच्या इतर घटकांमध्ये वाचनाची आवड, ओढ व प्रेरणा निर्माण व्हावी, तसेच विद्यार्थ्यांना आयुष्यात वाचनाचे महत्त्व पटावे, या दृष्टिने वाचन प्रेरणा दिन महत्वाचा आहे. वाचन संस्कृतीचा विकास व प्रसार ज्ञानसंपन्न आणि माहिती समृद्ध समाज घडण्यासाठी आणि भाषाविकास यासाठी आवश्यक आहे. मुळातच वाचन संस्कृती ही व्यक्तिमत्व विकास घडविण्याचे काम करीत असते.

... श्वेता पोटुडे-राऊत, माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड


 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी