आठ दिवसात तीन शेतकऱ्यांच्या बैलजोड्या चोरी..
शेतकऱ्यात दहशत
हिमायतनगर(अनिल मादसवार)ऐन खरीप हंगामाच्या दिवसात काळ्या मातीत तिफन फिरवणारी बैलजोडी आखाडयावरून चोरीला गेल्याने बळीराजा कोंडीत सापडला असून, मागील आठ दिवसात हिमायतनगर शेत शिवारातून तीन शेतकऱ्यांच्या लाखो रुपये किमतीच्या बैलजोड्या चोरीला गेल्याने शेतकरी वर्गात दहशतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याना शासनाने मदत करून हाथभार लावावा अशी मागणी होत आहे.
वरून राजाने पाठ फिरविल्यामुळे अगोदरच शेतातील अडचणीत आला आहे. पाऊस पडून रान भिजावे या साठी देवी देवतांना साकडे घालीत असताना सर्ज्या राज्याची जोडीच आखाडायावरून गायब होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. लाख मोलाची बैलजोडी गेल्याने पेरणीसह अन्य कामे कशी करावी या विवंचनेने शेतकऱ्यास ग्रासले आहे. नांदेड किनवट राज्य रस्त्यावरील सरसम शेत शिवारातील आखाड्यावर दि.२५ च्या रातीला बांधून ठेवलेली लाखो रुपये किमतीची बैल जोडी कोण्यातरी अज्ञात चोरट्यांनी लांबविली आहे. हा प्रकार दि.२६ रोजी सकाळी ६ वाजता जेंव्हा शेतकी मोती कोंडीबाराव मोरे हे शेतात गेले त्यावेळी उघडकीस आली. याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिमायतनगर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्या व्यक्तीवर कलम ३७९ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल कण्यात आला आहे.
दि.१८ रोजी रात्रीं आखाड्यावर बैलजोडी बांधून घरी झोपण्यासाठी शेतकरी परमेश्वर सोनबा डांगे गेले असता अज्ञात चोरट्यांनी बैलजोडी लांबविली होती. तसेच दि. १७ रोजीच्या रात्रीला दर्भ उमरखेड तालुक्यातील शेतकरी श्री रामराव गणपतराव माने हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीतीरावर असलेल्या शेतातील आखाड्यावरून बैलजोडी लांबविली होती. त्यानंतर दि. २५ च्या रात्री लाखोची बैलजोडी चोरीला गेल्याने पशु पालक व शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. से प्रकार घडत असताना देखील हिमायतनगर येथील पोलिस चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरतास्ल्याचे यावरून दिसून येत आहे.