अर्धापूर, निळकंठ मदने| अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील रहिवासी संदिप इंगोले हे मालेगाव जवळील रेडचिली ढाब्यावर रात्रीच्या सुमारास थांबले असता,त.यांच्यावर पाळत ठेवून स्कुटीवरुन तोंडाला रुमाल बांधून दोघाजणांनी धारदार शस्त्राने त्यांच्या शरीरावर प्राणघातक हल्ला करुन ठार केले, आरोपीं घटनेनंतर पसार झाले, त्यामुळे परीसरात एकच खळबळ उडाली असून, अर्धापूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्धापूर तालुक्यातील मालेगाव जवळील रेडचिली ढाब्यावर शनिवारी रात्री ११:३० वा.संदीप चंपतराव इंगोले रा.मालेगाव हे थांबले होते,दोघांनी तोंडाला रुमाल बांधून हातात धारदार तलवार व चाकू घेऊन इंगोले यांच्या दिशेने येऊन पाठीमागून पाठीवर व समोरुन छातीवर सपासप वार करुन, तु आमच्या कुटुंबाला अर्वाच्य भाषेत शिव्या का देतोस ? असे ते दोघे म्हणत वार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक अशोक जाधव,पोउनि साईनाथ सुरवसे,पोउनि कपील आगलावे,पोउनि तय्यब अब्बास, कैलास पवार, राजेश घुन्नर,पप्पू चव्हाण,गुरुदास आरेवार, संतोष सुर्यवंशी, तुकाराम बोईनवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली,पण दोन आरोपी पसार झाले. अर्धापूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध ३०२,२९४,३४ भादवी प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अधीक तपास पोलिस निरीक्षक अशोक जाधव हे करीत आहेत.