मुंबई। मुंबईकरांसाठी केंद्राच्या रेल्वे मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला . मुंबईच्या एसी ट्रेनचे दर 50 % कमी करण्यात आले . केंद्राच्या या निर्णयाचे राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले . मुबंईकरांसाठी हा अतिशय मोठा आणि महत्वाचा निर्णय आहे . मुंबईसाठी एसी ट्रेन सुरू झाली होती पण तिकीट दर जास्त असल्याने प्रवासी संख्या कमी होती
आता मात्र केंद्र सरकारने मुंबईच्या एसी ट्रेनच्या दरात टक्के कपात केली . त्यामुळे नागरीकाना मोठा दिलासा मिळणार आहे . प्रवासी देखील वाढणार आहे . या निर्णयाबद्दल केंद्र सरकारचे मनापासून आभार मानत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.