हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ गावात चोरट्याचा धुमाकूळ; अनेक घराचे कुलूप तोडले
हिमायतनगर| तालुक्यातील मंगरूळ गावात मध्यरात्रीला अज्ञात चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. या चोरटयांनी रात्रीला अनेक घराचे कुलूप तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला. रात्रगस्त करणाऱ्या युवकांच्या लक्षात येताच त्यांनी गावकर्यांना जागे केले. त्यामुळे चोरट्याना पळून जाण्यास भाग पडावे लागले असून, चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला आहे. या घटना लक्षात घेता तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी जागरूक राहून गस्त घातल्यास चोरीच्या घटनांना टळतील असा संदेश यातून मिळतो आहे.
हिमायतनगर तालुक्यातील मागील तीन महिन्यापासून चोंरट्यानी धुमाकूळ घातला आहे. कधी शहरात तर कधी ग्रामीण भागातील गाव, वाडी तांड्यात घरफोड्या करणे, घरात नागरिक असताना देखील घरात शिरून चोरी करणे, कुणी आडवा-आडव केली तर त्यांच्या हल्ला करून जखमी करत सोने, चांदीचे दागिन्यांसह नगदी रक्कम व सामना चोरून नेने, काही दुकाने फोडून चक्क भुसार मालाच्या चोऱ्या झाल्या आहेत. एवढेच नाहीतर जिथे काहीच मिळाला नाही त्या ठिकाणचे समानाची नासधूस करून दहशत पसरविणे, ज्या ठिकाणी सीएसटीव्ही कॅमेरे फोडून जमल्यास सीसीटीव्हीच्या सीडीआर देखील चोरून नेल्याच्या घटना मागील काळात घडल्या आहेत.
तेंव्हापासन हिमायतनगर तालुक्यात दिवसा-गणिक चोरीचे सत्र गाव सोडून दुसऱ्या गावात सुरूच आहे. या घटनांना अंकुश लावण्यासाठी श्वान पथक, ठसे तज्ज्ञांच्या माध्यमातून पोलिसांचे शर्तीचे प्रयत्न चालू असले तरी चोरटे ज्या भागाकडे पोलीस नाहीत तिकडे आपला मोर्चा वाळवून चोऱ्या करत आहेत. या अनुषंगाने आत्तापर्यंत हिमायतनगर पोलीस डायरीत घारापुर, एकंबा, हिमायतनगर, डोल्हारी, सवना, पोटा, सरसम, बोरगडी, वारंगटाकळी, आदींसह अनेक गावाच्या चोरीच्या घटनांच्या नोंदी झाल्या आहेत. परंत्तू चोरट्याना जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे गावागावात अनेक युवक आपापल्या गावचे रक्षण करण्याच्या उद्देशाने ग्रामसुरक्षा दल स्थापन करून रात्रगस्त करत आहेत.
रात्रगस्तीमुळे चोरट्याने आपला डाव साधने अवघड होत असून, असाच प्रकार दि.०८ डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ गावात घडला असल्याची माहिती माजी पंचायत समितीचे सदस्य पांडुरंग खंदारे यांनी दिली आहे. त्यांच्या मते मंगरूळ गावात रात्रीला काही युवक गस्त घालत असताना दुसऱ्या भागात अज्ञात चोरट्यांनी गावात शिरकाव केला. त्यांनी काही घरांचे कुलूप तोडून, दरवाजे काढून आता प्रवेश केला. दरम्यान हा प्रकार रात्रगस्त करणाऱ्या युवकांच्या लक्षात आल्याने त्यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. तसेच गावकर्यांना सतर्क करून जागे केल्याने चोरट्यांचा चोरी करण्याचा प्रयत्न फसला आहे.
एकूणच गावात युवकांच्या वतीने केली जाणाऱ्या रात्रगस्त फायद्याची ठरली असून, जर युवकांनी जागी राहून गावात पहारा दिला नसता तर नक्कीच गावातील अनेक घरात चोरी झाली असती अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. त्यामुळे हिमायतनगर शहरासह ग्रामीन भागातील प्रत्येक गाव, वाडी तांड्यातील नागरिकांनी ग्रामसुरक्षा दल स्थापन करून चोरीच्या घटनांना रोकण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा असे या घटनेवरून पुढे येत आहे.
पोलीस चोरीच्या घटनांना आवर घालण्यासाठी प्रयत्न करत असले तरी नागरिकांनी देखील पोलिसांना वेळोवेळी माहिती देणे, कुठे अनुचित घटना घडत असल्यास तात्काळ संपर्क करणे, आणि वेळ प्रसंगी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. कोण्यात्याही घटना घडताना प्रत्येक ठिकाणी पोलीस असले असे नाही, पोलीस सोबतीला असले तरी नागरिकांचे देखील सामाजिक दायित्व निभावल्यास अश्या घटनांना नक्कीच आळा बसण्यास मदत होईल असे जुने जाणकार बोलून दाखवत आहेत.