परिवर्तनवादी चळवळीचे खरे उर्जास्त्रोत कॉ.गंगारेड्डी-आ.केराम -NNL


नांदेड|
परिवर्तनवादी चळवळ आणि ध्येयवादी राजकारणात, समाजसेवेसाठी कॉ.गंगारेड्डी बैनमवार यांच्यासारखे व्यक्तीमत्व खरे उर्जास्त्रोत असल्याचे गौरवउद्गार किनवटचे आ.भीमराव केराम यांनी काढले.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ.गंगारेडी बैनमवार यांच्या वाढदिवसानिमित्त येथील साईबाबा मंदिर सभागृहात अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलतांना आ.भीमराव केराम म्हणाले की, आयुष्याची तब्बल 45 वर्ष राजकारण व समाजकारण निष्कलंकपणे समर्पित करणारे किनवटचे भूमिपुत्र भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ.गंगारेड्डी बैनमवार यांनी राजकारणाबरोबरच समाजकारणासाठीही स्वतःला समर्पित केले आहे. मागील 45 वर्षांपासून ते निस्वार्थपणे जनतेची सेवा करत आहेत. 

आज काल स्वतः पैसे खर्च करून काही लोक वाढदिवस साजरे करतात. स्वयंघोषित नेते बनण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. मात्र कॉ. गंगारेडी बैनमवार यांचा वाढदिवस लोकांनी स्वतःचे पैसे खर्च करून साजरा केला यातून कॉ. बैनमवार हे लोकनेते आहेत ते स्पष्ट होते. समाजकारण आणि राजकारणात काम करणार्‍या आमच्या सारख्या नेत्यासाठी ते खर्‍या अर्थाने ऊर्जास्रोत आहेत. नव्हेतर परिवर्तनवादी सर्वच चळवळींना कॉ. गंगारेड्डी सारखी माणसाची गरज असल्याचे मत आ.भीमराव केराम यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष इसाखान होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. भीमराव केराम ऍड.कॉ. प्रदीप नागापूरकर, किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल राठोड, सचिव शंकर चाडावार, माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेमानीवार, नारायणराव सिडाम, कम्युनिस्ट नेते कॉ.उत्तमराव राठोड, नगराध्यक्ष आनंद मच्चेवार, ज्येष्ठ पत्रकार के. मूर्ति, कॉं.मजीत चव्हाण, रिपाइं नेते दादाराव कयापाक, विश्वांबर दहिफळे पाटील, प्राचार्य शिवाजीराव बेंबरेकर, भगवान बाबा, अनिल तिरमनवार, उत्तम जाधव, उपसभापती कपिल करेवाड, अशोक नेमानीवार, नगरसेवक जहीर खान, माजी नगराध्यक्ष साजिद खान, भाकपचे सहसचिव कॉ.शिवाजी फुलवळे यांची उपस्थिती होती. 

यावेळी त्यांचा शाल, श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. तर सत्काराला उत्तर देताना कॉ. गंगारेड्डी बैनमवार म्हणाले की, आज सर्वच क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते, हितचिंतक माझा वाढदिवस एवढ्या मोठ्या स्वरूपात साजरा करत आहे त्या गोष्टीचा मला अतीआनंद होत आहे. मी आयुष्यात माणसे कमावली गोरगरिबांसाठी सतत झगडत आलो माणसाचे कामे माणसाच्या हितासाठी उपयोगात येत नसेल तर अशा आयुष्यात काहीच फायदा नाही. त्यामुळे प्रत्येक नेत्याने मानवाचे हीत केंद्रस्थानी ठेवून काम केल्यास निश्चितपणे देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असा आशावाद व्यक्त केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पत्रकार दुर्गादास राठोड यांनी केले तर उपस्थितांचे आभार कॉ.सुनील राठोड यांनी मानले. 

याप्रसंगी देवराव गोणेवार, भाजपाच्या महिला राज्य कार्यकारिणी सदस्य सौ. संध्याताई प्रफुल राठोड, माजी पंचायत समिती सदस्या सुरेखा घाटकर, गंगुताई परेकार, शेख परवीन बेगम, भावना दीक्षित, मनीषा चौधरी, कॉ. जनार्दन काळे, इंदल राठोड, माधवराव नाईक, शाबीर खान, माजी नगरसेवक अली सेठ, संदीप निखाते, कॉ.महेमुद पठाण, विजय बैनमवार यांच्यासह मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी