नांदेड तालुक्यात नदीकाठावरील गावांतील घराचे व शेतातील पिंकाचे नुकसान -NNL


नविन नांदेड|
तालुक्यातील वाजेगाव व बळीरामपुर जिल्हा परिषद सर्कल असलेल्या नदी काठावरील गावांचे अतिवृष्टीमुळे जवळपास शंभर टक्के नुकसान झाले असून, पुनर्वसित गावातील मुलभूत  प्रश्न अद्यापही शासन दरबारी प्रलंबित आहेत. तर अतिवृष्टी दरम्यान जवळपास आठ ते दहा दिवस काही गावांचा संपर्क तुटला होता तर अनेक सखल भागात संततधार पावसामुळे पाणी शिरले घरांची पडझड झाली. संसार उपयोगी वस्तूची नासधूस मोठ्या प्रमाणात झाली, शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी शासनाकडून अद्याप कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. तात्काळ अतिवृष्टी दरम्यान झालेल्या नुकसानीचे अनेक भागात पंचनामे झाले. नेते कार्यर्कत्यांनी गावामध्ये भेटी दिल्या पाहणी केली मात्र अद्यापही शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत मिळाली नाही. 

पाहणी करणे आश्वासन देणे या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झाली आहे नदीकाठच्या काही गावांचा अतिवृष्टी दरम्यान जवळपास आठ ते दहा दिवस संपर्क तुटला होता. गावात नाली सारखे पाणी वाहत होते. ग्रामस्थ यांचा सामना जीवावर बेतुन गेला. मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत होती प्रत्यक्षात जाऊन शासनाने मदत केली नाही असंही खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे नांदेड तालुक्यातील वाजेगाव व बळीरामपुर सर्कल मधील अनेक गावांत पाणी शिरल्याने संसार उपयोगी वस्तू नासधूस झाली तर पुनर्वसित गावाचे प्रश्न अद्यापही शासन दरबारी प्रलंबित आहेत गावात जाणाऱ्या रस्त्यावर नाल्यावरील पूल कमी उंचीचा असल्यामुळे पाऊस झाला की लगेच या पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे गावात जाणारा रस्ता बंद होत आहे, पुलाची उंची वाढवावी किंवा पर्यायी रस्ता देण्याची मागणी होत आहे,तर मुलभूत सुविधा अद्याप ही प्रलंबित आहेत.

नांदेड तालुक्याच्या दक्षिण व उत्तर भागातील नदी काठावरील गावे राहेगाव, गगाबेट, मार्कंड, बेटसांगवी, पिंपळगाव कोरका,  नागापूर, वाजेगांव, बोढार हवेली,  वांगी, गाडेगांव, वडगांव, पिंपळगाव मीश्री, ब्राम्हणवाडा, सिद्धनाथ, पुणेगांव, कामठा, राहेगाव ,त्रिकुट,यमशेटवाडी,यासह अनेक गावातील शेती पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाली आहे. शासनाकडून फक्त घोषणा केली आहे मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत देण्यासाठी मोठा विलंब लावल्या जात आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक  विवंचनेत  सापडले असून शासनाने त्वरित मदत देण्याची गरज आहे. गोदावरी काठावर असलेल्या राहेगाव येथे नाल्यावरील पुलाची उंची कमी असल्यामुळे या गावाचा अतिवृष्टी दरम्यान आठ दिवस संपर्क तुटला होता अनेक नेत्यांनी जाऊन पाहणी केली पंचनामे करण्यात आले मात्र शासनाकडून अद्यापही मदत मिळाली नाही ,पुनर्वसित गावांचा प्रश्न शासन दरबारी अद्याप प्रलंबित असून केवळ आश्वासने दिले जातात रस्त्याचा प्रश्न प्रलंबित असून, पुलावरील उंची वाढून नवीन पूल बांधण्यात यावा किंवा पर्याय रस्ता मिळावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. 

ब्राह्मणवाडा,गाडेगाव, नागापूर, सिध्दनाथ,त्रिकुट, वांगी, या गावात अतिवृष्टीमुळे  अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले घरांची पडझड झाली प्रशासनाने पंचनामे केले मात्र अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. पिंपळगाव निमजी, पांगरा, विष्णुपुरी, तुपा, गोपाळ चावडी, भायेगाव, किकी, कांकाडी, राहेगाव, फतेपुर, ईजेगाव, वाडीपुयड, वडगाव, पुणेगाव, कामठा,बोढार हवेली, धनगरवाडी,खुपसरवाडी, मार्कंड,भनगी,पिंपळगाव,वाहेगाव कलहाळ, गंगाबेट,गुडेगांव, बाभुळगाव यासह दोन्ही जिल्हा परिषद सर्कल, पंचायत समिती गण मधील अनेक शेतातील शेतक-यांचे  सोयाबीन ,कापुस,ऊस,केळी व भाजीपाला शेती पिकाचे  शंभर टक्के नुकसान झाले आहे. आ. बालाजीराव कल्याणकर आ.मोहनराव हंबर्डे, जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे,  यांच्यासह अनेक राजकीय पुढाऱ्यांनी नुकसानीची पाहणी केली आहे,व मुख्यमंत्री, कृषीमंत्री, पालकमंत्री यांच्या सह जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या कडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही आता पाहणी बंद करा प्रत्यक्षात नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी  परिसरातील गावकऱ्यांनी केली आहे. ग्रामसेवक, तलाठी,मंडळ अधिकारी, यांच्या सह प्रशासकिय अधिकारी यांनी पाहणी करून पंचनामे केले आहेत. गोदावरीच्या काठावर असलेल्या गावामध्ये अतिवृष्टीमुळे पाणी शिरले या गावांमध्ये घरांची पडझड झाली त्याचबरोबर शेती पिकांचे  शंभर टक्के नुकसान झाले हे वास्तव असून अनेक भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान  झालेले दिसून येत आहे, शासनाने त्वरित मदत करावी, अशी मागणी नांदेड तालुक्यातील जिल्हा परिषद बळीरामपुर व वाजेगाव मतदार संघातील  शेतकऱ्यांनी केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी