पोलीस ठाण्यात निवेदन देऊन केली मागणी, अन्यथा पोलिसांच्या विरीधात उभारणार आंदोलन
तालुक्यातील ग्रामिण भागात अवैद्य देशी दारूची वाहतुक, विक्री होत असतांना उत्पादन शुल्क विभाग, बिट जमादाराचे याकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष होत आहे. कित्येक वर्षा पासुन सुरू असलेल्या अवैद्य मद्य विक्रीमुळे कित्येकांचे संसार उध्दवस्त होत आहेत. अनेकजन दारू, जुगार, मटक्याच्या सवयीमुळे वडीलोपार्जीत शेती विकुन भुमिहीन बनले आहेत. गावातच देशी दारू मिळत असल्याने तरुण मद्यप्राशन करून नाहक त्रास देवुन गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होत असल्याच दिसुन येत आहे.
तसेच जुगाराचे डाव आहे मोठ्या प्रमाणात चालविले जात असल्याने दिवसभर केलेल्या कामाची मजुरी ज्यादा पैसे मिळतील या आशेने जुगारावर लावून मजूरदार व शेतकरी कंगाल होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. असे असताना देखील पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प बसले असल्याचा आरोप केला जात आहे.
उशीरा का होईना तालुक्यातील सवना, वाशी, रमनवाडी पाठोपाठ आंदेगावच्या महिलांनी दारू, जुगार बंद करण्यासाठी कंबर खोवली आहे. पोलिस ठाण्यात जाऊन महिलांनी पोलीस उपनिरीक्षक परशुराम देवकते यांना निवेदन दिले, तात्काळ यापुढे दारू बंदी झाली पाहिजे अन्यथा पोलिसांच्या विरोधात आंदोलन छेडू असा इशारा महिलांनी दिला आहे. यानंतर पोलीस दारूबंदी व जुगाराच्या अड्ड्यावर पोलीस कारवाई कशी करतात ते पहायला मिळणार आहे.
सुरूवातील तालुक्यातील मौजे सरसम येथिल महिलांनी दारू बंदीसाठी पुढाकार घेतला होता. आताही महिला पोलिसांना अवैद्य देशी दारू संदर्भात जाब विचारण्याची तयारी करत आहेत. तत्पुर्वीच बिट जमादारांनी लक्ष घालने जनतेच्या हिताचे राहिल. असे महिला बोलून दाखवीत आहेत.