राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात शिवसंपर्क अभियानाला सुरवात झाली आहे .खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली,नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील शिवसंपर्क अभियानाची सुरवात नांदेड मधून केली होती. हिंगोली लोकसभेमध्ये येणाऱ्या हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील ठिकठिकाणी होणाऱ्या शिवससंपर्क अभियान कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित दिसून येत आहे. त्याच अनुषंगाने नांदेड शहरातील गाडीपुरा भागातील उपशहरप्रमुख शैलेशसिंह रावत यांच्या शाखा आणि जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा प्रमुख आनंद बोंढारकर आ.बालाजी कल्याणकर, बाळासाहेब बारडकर, तालुका प्रमुख उद्धवराव शिंदे, तालुका प्रमुख तुकाराम,पवार, सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार, महानगरप्रमुख अशोक उमरेकर, विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्राचे सरचिटणीस प्रवीण जेठेवाड, नांदेड दक्षिण शहर प्रमुख तुलजेश यादव, महिला आघाडीच्या शहरसंघटक सविता बैस, चिंचोलकर मॅडम, यांच्यासह जेष्ठ शिवसैनिक भारत कुकडे, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना ते म्हणाले की, शैलेशसिंह हा सर्वसामान्य लोकांसाठी झटणारा एक प्रामाणिक आणि सच्चा कार्यकर्ता आहे तो सुरवाती पासून शिवसेनेशी प्रामाणिक राहूनच कार्य करत आला आहे.
पुढेही करत राहणार यात दुमत नाही. सर्व सामान्य जनतेशी प्रामाणिक राहून काम करणे आणि राजकारणापेक्षा समाजकारणाला झुकते माप देणे हीच खरी शिवसेनेची शिकवण आहे.असे कार्य करून जनतेचा विश्वास संपादन केला तर जनता तुम्हाला नक्कीच यशाच्या शिखरावर नेऊन बसवेल. अन्यथा जनतेशी गद्दारी केली तर त्याचेही फळ जनता तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही.केवळ कार्यालय अघडून चालणार नाही तर समाजातील शोषित पीडितांना तुमच्या कार्यालयात आल्यानंतर हक्काचा आधार वाटला पाहिजे तरच त्याचे सार्थक होईल.
तशी ओळख प्रत्येक शिवसैनिकाला आपल्या कार्यातून निर्माण करावी लागेल. घोषणा आणि मोठ- मोठ्या गर्जना करून काही होणार तर त्यासाठी तुम्हांला सर्व सामान्य जनतेमध्ये जाऊन कार्य करावे लागेल त्यांचे प्रश्न अडीअडचणी समजून घेऊन त्यांना प्राधान्याने सोडवावे लागेल. मग यश तुमच्या पदरात नक्की पडेल.असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले. कार्यक्रमाला अवतारसिंग पेहरेदार, गुरमित सिंग तमन्ना, अंकित तेहरा, बालाजी परदेशी, चरण परदेशी, अजय वरणेकर, राखीसिंह बिसेन, दशरथसिंह परदेशी अतुल ठाकूर, यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.