पहिल्यांदाच सांस्कृतिक रंगारंग कार्यक्रमही रंगणार
कंधार (मयूर कांबळे) विश्व हिंदू परिषद वर्धापन दिन व श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त कंधार शहरात दहीहंडीचे आयोजन दि .१४ ऑगस्ट रोजी शिवाजी चौक येथे करण्यात आले असून या दहीहंडी स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीतजास्त संघांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजक ॲड. गंगाप्रसाद यन्नावार यांनी केले आहे .कंधार च्या या दहीहंडीचा लहान थोरांना सह सर्वांना आंनद मिळावा म्हणून मोठ्या स्क्रीन लावण्यात
येणार आहेत.विश्व हिंदू परिषद ,बजरंग दल व हिंदुत्व वादी संघटनांच्या वतीने गेल्या १७ वर्षांपासून कंधार शहरात दहीहंडीचे आयोजन करण्यात येते .यंदाचे १७ वे वर्ष आहे . मोठ्या शहरात दहीहंडीचे आयोजन मोठ्या प्रमाणावर केले जाते परंतु कंधार सारख्या ग्रामीण भागात गत १७ वर्षा पासून हा दहीहंडी उत्सव अविरतपणे चालू आहे.
यावर्षी दि. १४ अॉगस्ट रोजी दुपारी ४ वा शिवाजी चौक कंधार येथे दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे , यात प्रथम येणाऱ्या संघास प्रायोजक मामडे ज्वेलर्स चे शिवा मामडे यांच्या वतीने १११११ रुपये व स्मृती चषक व सहभागी संघास प्रोत्साहनपर बक्षीस आणि स्मृती चषक देण्यात येणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे व नागरीकांचे मनोरंजन होवुन रंगत येण्यासाठी प्रथमतः अमोल मालेगावकार यांचा देश भक्तीपर गीतांचा रंगारंग कार्यक्रम आयोजित केला आहे. या दहीहंडी स्पर्धेत जिल्ह्यातील संघांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक ॲड. गंगाप्रसाद यन्नावार यांनी केले आहे. या दहीहंडी स्पर्धेचा आनंद प्रेक्षकांना घेता यावा यासाठी भव्य अश्या मोठ्या स्क्रीन लावण्यात येणार आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व हिंदुत्ववादी संघटनाचे कार्यकर्ते परीश्रम घेत आहेत.