नांदेड जिल्ह्यातील सहस्रकुंड धबधबा
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर गणेशाच्या स्वागताला दमदार पावसाने हजेरी लावली असून, हिंगोली जिल्ह्यात झालेल्या पावसाने कयाधू नदी दुथडी भरून वाहत आहे. तेच पाणी विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला येउन मिळत असल्याने दि. ३१ रोजी दुपारी ११ वाजता नांदेड जिल्ह्यातील सहस्रकुंड धबधबा खळवळून वाहण्यास सुरुवात झाली असून, हळू हळू पाण्याची तीव्रता वाढत आहे. मागील अनेक महिन्यापासून निसर्गनिर्मित्त धबधब्याच्या विहंगम दृश्यापासून वंचित पर्यटकांच्या डोळ्याचे आता पारणे फिटणार आहेत. छाया- अनिल मादसवार(नांदेड न्युज लाइव्ह)