दुधड ते वाळकेवाडीच्या मुख्य रस्त्यावर नदीवरील असलेल्या पुलावरून ग्रामर्थ्यांचा जीवाघेना प्रवास चालूच;3 म्हैस 2 गाय पुरात वाहून गेल्या -NNL

वारंवार तक्रार -निवेदन देऊन सुद्धा प्रशासन व लोकप्रतिनिधी निद्रअवस्थेत... येथील नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया 


हिमायतनगर/वाळकेवाडी, शंकर बरडे।
हिमायतनगर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या दुधड /वाळकेवाडी ची लोकसंख्या 7 हजार असून वाळकेवाडी हे गाव 100% आदिवासी लोकसंख्या असलेल्या या गावात 1ली ते 12 वी पर्यंत आदिवासी विकास विभागाची आश्रम शाळा , 1ली ते 7 वी पर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे गावातील नागरिक शिक्षक विद्यार्थी यांना पावसाळ्यात ये-जा करण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.


गावाच्या जवळ एक मोठे तलाव आहे सदरील तलाव हे दर पावसाळ्यात तुटुंब भरते त्यामुळे थोडा जरी पाऊस झाला कि लगेच नदीला मोठा पुर यत असतो, व ओसरण्यास 4-5 तास वेळ लागत असतो . पुर आल्यावर सर्वांना त्याच ठिकाणी पुर ओसरण्याची वाट पहावी लागते कित्येक वेळेस जणावरे व माणसे सुध्दा पुराच्या पाण्याने पुलावरून नदीच्या प्रवाहात जात असतात  हि दुर्दैवी गोष्ट आहे. येथील पुलाची मागणी नागरीकांच्या वतीने अनेक वेळा मागणी केली पण फुल काही झाला नाही. 


आता दुधड ग्रामपंचायतचे सरपंच यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे सदरी पुलाची मागणी केली आहे आतातरी पुल मंजूर होईल का अशी नागरिकांच्या मनात विचार यत आहेत सदरील पुलाचे काम मंजूर केल्यास येथील नागरिकांना शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकांना मोठा दिलासा मिळेल.

कालच्या पावसाने सुभाष सूर्यवंशी यांच्या 3 म्हैस 2 गाय पुरात वाहून गेल्या सुदैवाने युवकांच्या मदतीने कुठल्याही प्रकारची जीवित हनी झाली नाही.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी