हदगाव, शे.चांदपाशा| ब्रिटिशांच्या व निजामच्या जुल्मी सत्तेच्या विरोधात आद्यक्रांतिवीर राजे नोवसाजी नाईक यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने २० वर्षेहून अधिक काळ सशस्त्र लढा दिला होता. त्यांच्या कार्याने ओळख असलेल्या हदगाव तालुक्यातील शोर्य भुमी नाव्हा येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त योध्यांच्या स्मृतीला उजाळा देण्याकरिता 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचत्य साधून,१७ सप्टेंबर२०२२ रोजी आद्यक्रांतीविर नोवसाजी नाईक यांच्या शौर्य भूमी नाव्हा येथे ऐतिहासिक फलकाचे अनावरण त्यांचे वारस डॉ प्रकाशराव नाईक व मान्यवरांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी इतीहास प्रेमींनी मार्गदर्शन करीत पुढील काळातील रणनिती सबंधी चर्चा केली. यावेळी तालुक्यातील नाव्हा येथील संरपंच पुंडलिक नरवाडे, उपसरपंच प्रकाशराव देशमुखे, डॉ प्रकाशराव नाईक इसापूरकर, बाळासाहेब नाईक हिंगोली, दिंगाबर साखरे पिंपरखेडकर,भगवान निळे डोंगरगावकर,गुलाबराव हाके माळझरा, नारायण नाईक चिंचगव्हान, पंढरीनाथ ढाले, बालासाहेब मस्के केदारनाथ, अविनाश नाईक पुसद, गोपाल कोरडे महागाव, सुर्यकांत हानवते,हसनराव नाईक , गजानन सुकापुरे, निरंजन दहेकर, प्रभाकर दहिभाते, ज्ञानेश्वर हाराळ, विठ्ठलराव मस्के, पवन वानखेडे, पळसा, सुरेश मस्के, बाबुराव करनोरे,नाव्हा चेअरमन बालाजी पारडकर, माजी सरपंच सखाराम डवरे, बाबाराव तळेगावकर,संतराम ,शंकर करवर, गोफने सह तालुक्यातील आजी माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य संरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक कार्यकर्ते इतिहास प्रेमी समाज बांधव उपस्थित होते.