हदगाव/नांदेड। हदगाव येथील आर्य वैश्य समाजातील प्रमोद शेट्टी यांच्या घरावर दरोडा टाकून दरोडेखोरानी जवळपास 50 लाख रुपयांचा मुद्देमाल पळविला आहे. हि घटना रविवारी पहाटे घडली.
घटनेची माहिती महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या पदाधिकाऱ्यांना कळताच सोमवारी दिनांक 18 जुलै रोजी महासभेचे राज्य व जिल्ह्यातील असंख्य पदाधिकाऱ्यांनी हदगाव येथे जाऊन शेट्टी परिवाराची भेट घेतली. महासभा आपल्या पाठीशी आहे असा धीर दिला त्यानंतर महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने तहसील कार्यालयात आणि पोलीस ठाण्यात दरोडेखोरांना तत्काळ अटक करण्याची मागणी करणारे निवेदन दिले आहे. याप्रसंगी तहसीलदार व पोलीस अधिकाऱ्यांनी आम्ही सखोल चौकशी करीत असून दरोडेखोर लवकरात लवकर अटक होतील असे आश्वासन दिले.
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे माजी अध्यक्ष एकनाथराव मामडे, कोषाध्यक्ष सुभाष कन्नावार, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, राज्य प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र येरावार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजयकुमार कुंचनवार, सुरेश पंदीलवार, रवींद्र बंडेवार, प्रभाकर पत्तेवार, अनिल मनाटकर, प्रदीप मनाटकर, सुरेश पोकलवार, प्रशांत पोपसेटवार, प्रवीण जन्नावार, श्याम मारुडवार, अशोक व्यवहारे, यांच्यासह महाराष्ट्र आर्य विषय महासभेचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते