सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा, जिल्हा परिषदेच्या शाळेचे रुपडे बदलणार
अर्धापू। शहरातील विविध भागात विविध विकास कामे झाल्याने शहराचा कायापालट होत असून शहरातील प्रत्येक नागरिकाला हक्काचे पक्क घर मिळावे यासाठी पंतप्रधान आवास योजनेचा तिसऱ्या टप्प्यातील घरं देण्यासाठी डीपीआर तयार करण्यासाठी अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.तसेच जिल्हा परिषद शाळेसाठी सुसज्ज इमारत, शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण करणे आदी विषयांवर चर्चा झाली आहे अशी माहिती नगराध्यक्ष छत्रपती कानोडे यांनी दिली.
नगरपंचायतीच्या निवडणूकी नंतर झालेली दुसरी सर्वसाधारण सभा गूरूवारी (ता १२) छत्रपती कानोडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झालीं.या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.या सभेत पंतप्रधान आवास योजनेचा तिसरा टप्पा राबविणे, जिल्हा परिषद कन्या शाळा व जिल्हा परिषद माध्यमिक शाळेसाठी सुसज्ज इमारत बांधण्यासाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविणे, शहरातील सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण करणे,वैदु सामाजासाठी व शादिखानासाठी जागा उपलब्ध करणे, जिल्हा परिषदउर्दू शाळेसाठी जागा संपादित करणे,नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी उपलब्ध करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
या सर्वसाधारण सभेला उपनगराध्यक्षा यास्मिन सुलताना, गटनेते बाबुराव लंगडे, शालीनी शेटे, शेख जाकेर, डॉ पल्लवी लंगडे, कान्होपात्रा माटे, वैशाली देशमुख, मिनाक्षी राऊत, मुक्तेदर पठाण, काजी सायरा बेगम, मिर्झा शहाबाज, सलीम कूरेशी, सोनाजी सरोदे,नामदेव सरोदे उपस्थित राहून विविध विषयांवर चर्चा केली. मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी विविध विषयांची कायदेशीर बाबी माहिती देवून नगरसेवकांचे समाधन केले.सभेची सुरुवात राष्ट्रगीताने झाली.या सभेला सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी अर्धापूर शहरातील आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा, मलनिःसारण रस्ते आदींसाठी खुप मोठा निधी उपलब्ध करून दिल्याने शहराचा कायापालट होत आहे.आगमी काळात शहरात विविध विकास योजना राबविण्यात येणार आहे आहेत अशी माहिती नगराध्यक्ष छत्रपती कानोडे यांनी दिली.