व्यवस्थापकीय संचालक डॉ.विजय जंगम स्वामी व संचालक वैजनाथ स्वामी यांनी ब्रम्हांड ऊर्जा हेल्थ केअर या कंपनीची स्थापना 2019 वर्षी केली असून या कंपनीद्वारे आयुर्वेदिक उत्पादन निर्मिती करून ती उत्पादने देशभर विक्री करण्याचा मानस आहे.या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे,भारतीय आयुर्वेद उपचार पद्धती जनमानसात पोहचवणे या उदात्त हेतूने कंपनीची वाटचाल सुरू आहे.ऊर्जा आयुर्वेद निर्मित कश्यप सुवर्णप्राशन ड्रॉप हे जन्मलेल्या बाळा पासून सोळा वर्षे मुलामुलींना देता येणार आहे.हे सुवर्णप्राशन ड्रॉप्स दिल्याने मुलांचा शारीरिक व बौद्धिक विकास होईल,हे औषध आरोग्यशक्ती तथा बुध्दिमत्तेसाठी पोषक आहे. आपल्या भारतीय आयुर्वेदात सुवर्णप्राशनाला फार महत्व असून सुवर्ण प्राशन ही एक अतिप्राचीन आयुर्वेद चिकीत्सा पद्धती असुन यामध्ये बालकाची व्याधी प्रतिकार क्षमता , बुध्दी , स्मृती , एकाग्रता , वर्ण , पचन व आयुष्य वर्धनासाठी सुवर्ण भस्म व इतर वनस्पतींपासुन तयार केलेले औषध तोंडाद्वारे दिले जाते . सुवर्ण प्राशनाचे फायदे बालकाची व्याधीप्रतीकार शक्ती वाढते व बालक वारंवार आजारी पडणे कमी होते.बालकांची स्मृती,एकाग्रता,ग्रहणशक्ती , बुध्दी,व मेघा वाढते.
बालकांचा वर्ण,उंची,पचन व आयुष्य सुधारते. Delayed milestone , Attentions deficit hyperactivity disorder यामध्ये तसेच बालकांचा बुध्यांक वाढण्यास मदत करते.असे बहुगुणी असलेले हे ऊर्जा आयुर्वेदा निर्मित कश्यप सुवर्ण प्राशन ड्रॉप्स आपल्या मुलांसाठी लाभदायी आहे.हे कश्यप सुवर्ण प्राशन ड्रॉप्स जन्मलेल्या बाळा पासून एक वर्ष बाळास दररोज उपाशी पोटी एक थेंब द्यायचा आहे तसेच एक वर्ष ते पाच वर्षे मुलामुलींना सकाळी उपाशी पोटी दोन थेंब सुवर्ण प्राशनाचे दोन थेंब द्यावे तसेच पाच वर्षे ते सोळा वर्षांच्या मुलामुलींना दररोज उपाशी पोटी दोन ते तीन थेंब सुवर्ण प्राशन द्यावे,व पुष्य नक्षत्र दिवशी आवर्जून प्रत्येक मात्या पित्याने आपल्या मुलांना दिलं पाहिजे.
मुलांना सदृढ , निरोगी व तेजस्वी बनविण्याची आयुर्वेदिक उपचार पध्दतीने तयार केलेले उर्जा आयुर्वेद निर्मित कश्यप सुवर्ण प्राशन ड्रॉप्स आपल्या मुलांचे सुरक्षा कवच आहे.सुवर्ण प्राशनाचे महत्व सुमारे पाच हजार वर्षापूर्वी आयुर्वेदातील बालरोग ग्रंथ कश्यप संहिताचे पुरस्कर्ते महर्षी कश्यप यांनी सुवर्ण प्राशनाचे विशेष महत्व सांगितले आहे . सुवर्ण प्राशनंं हि एतत् मेधाग्निबलवर्धनम् । आयुष्य पुण्यं वृष्यं ग्रहापहम् ।। मासात् परममेधावी व्याधीभिर्न च धृष्यते । षड्भिर्मासैः श्रुतधरः सुवर्ण प्राशनाद् भँवेत् ।। याचा अर्थ : - म्हणजेच हे सुवर्ण प्राशन करायचे आहे ते मेधा ( धारणशक्ती ) म्हणजेच बुद्धिमत्ता वाढवणारे असेल . ज्यामुळे अग्नी म्हणजेच पचनशक्ती - पचनक्रिया सुधारते . हे बल वाढविणारे आहे तसेच आयुष्यदायी म्हणजेच आयुष्य वाढविणारे आहे वृष्यं ग्रहापमान म्हणजेच ग्रहपीडा दूर करणारे आहे . सुवर्णप्राशनाच्या नित्य सेवनामुळे अंग कांती सतेज बनते व मुलांची स्मरणशक्ती वाढीस लागते . ज्या बालकांना जन्मापासून । ते १६ वर्षापर्यंत सुवर्ण प्राशन केले ते मुल श्रुतधर म्हणजेच बुद्धिमान होते . सुश्रुत संहितेत देखील सुवर्ण प्राशनाचे महत्व सांगितले आहे .
सुश्रुताचार्यांप्रमाणे वाग्भटाचार्यांनी आपल्या ' अष्टांगहृदय ' या ग्रंथात देखील बालकांना सुवर्णप्राशन करावयास सांगितले आहे . तसेच शास्त्रानुसार पुष्य नक्षत्र हे याची सुरुवात करण्यास चांगले मानले जाते . संदर्भ : कश्यप संहिता - सूत्रस्थान लेहाध्याय सुश्रुत संहिता - शारीरस्थाने अध्याय १० श्लोक १५ अष्टांगहृदय - चिकित्सा स्थान अध्याय २८ श्लोक १ षोडश संस्कार- उत्तरस्थान अध्याय १ श्लोक ९ नवजात बालकांसाठी केल्या जाणाऱ्या विधीमध्ये सुवर्णप्राशन संस्कार भारतामध्ये पूर्वापार चालत आला आहे . व्यक्तीच्या आयुष्यावर विविध टप्प्यांवर केल्या जाणाऱ्या सोळा संस्कारामध्ये या संस्काराचा समावेश होतो .
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सत्यनारायण श्रीमाळी यांनी हे सुवर्ण प्राशन उत्पादन देशभरातील मुलांना देण्यासाठी ब्रम्हांड ऊर्जा हेल्थ केअर या कंपनीने पुढाकार घेऊन याची निर्मिती केली याचा अभिमान वाटतो असे उद्गार या वेळी काढले,डॉ.वैभव देवगिरकर यांनी सुवर्ण प्राशनचे महत्व व त्याचा मुलावर होणारा परिणाम खूप प्रभावी असतो हे प्रत्येक आई वडीलानी आपल्या मुलांसाठी दिलं पाहिजे असे प्रतिपादन केले.डॉ.प्रसाद पवार यांनी ब्रम्हांड ऊर्जा हेल्थ केअर या कंपनीच्या नावातच ऊर्जा आहे आणि या द्वारे निर्माण केल्या जाणाऱ्या सर्व आयुर्वेदिक उत्पादनाची ऊर्जा ही प्रत्यकाला मिळेल यात शंका नाही,या उत्पादनात शुद्धता व आयुर्वेदिक औषधी निर्माण पद्धतीचा काटेकोरपणे अवलंब केला गेल्याचे सांगितले,या वेळी ब्रम्हांड ऊर्जा हेल्थ केअरचे कार्यकारी संचालक डॉ.विजय जंगम स्वामी,संचालक वैजनाथ स्वामी,डॉ.रामलिंग शेटे,डॉ.शबनम,प्रदीप ओझा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ.विजय जंगम स्वामी यांनी आपल्या कंपनीच्या ध्येपूर्तीसाठी सर्वांना सोबत घेऊन आयुर्वेद क्षेत्रात ऊर्जा आयुर्वेदा हे ब्रँड देशभर पोहचेल या कंपनीचे सर्व उत्पादने सर्वांना परवडणारी व लाभदायी असणार आहेत असे सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव स्वामी व जगन्नाथ जंगम यांनी केले तर आभार प्रदर्शन सतीश जंगम यांनी केले.