मुसळधार पावसामुळे पारवा, आष्टी, जवळगाव भागातील हजारो एकर मधील पिके नुकसानीत -NNL

रुद्राणीचा पर्यायी पूल वाहून गेल्याने हदगाव- हिमायतनगर मार्ग बंद   


हिमायतनगर|
घारापुर मार्गे अर्धापुर ते फुलसंगावी जाणारा राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काम रुद्राणी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या ठेकेदारकडून चालू आहे. ठेकेदाराने कामात संत गती चालविल्याने खैरगाव जवळील पुलाचे काम अर्धवट आहे. त्यामुळे काल -आज झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी पारवा, आष्टी, जवळगाव भागातील हजारो एकर मधील पिके थेट शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी घुसल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याची चौकशी करून नुकसान भरपाई देण्यात अन्यथा प्रहारतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. 


अर्धापुर ते फुलसंगावी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु झाल्यापासून रुद्राणीच्या ठेकेदारने नाकर्तेपणाचा कळस गाठला आहे. त्यांच्या या बेजबाबदार कारभारामुळे आत्तापर्यंत दोन जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. तर अनेक अपघात होऊन नागराईक जखमी झाले आहेत. असे असताना देखील कामात गती देऊन दरजा सुधारण्यात कुचराई केली जात आहे. त्यामुळे काम पूर्ण होण्याअगोदरच तामसा भागात व इतर ठिकाणी सिमेंट कोक्रेटीकरणाला भेगा पडल्या आहेत. अश्या ढिसाळ कारभारामूळे खैरगाव जवळील पुलाचे काम अद्यापही अर्धवट आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मुसळधार पाऊस होताच प्रचंड नुकसानीचा सामना करावा लागत आहे. 

नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे पारवा, आष्टी, जवळगाव, कामारी, कामारवाडी भागातील हजारो एकर मधील पिके पाण्याखाली आली असून, पुलाच्या अर्धवट कामामुळे पुराचे पाणी पुढे जाण्यास अढथळा निर्माण झाल्यामुळे हे नुकसान झाल्याचे शेतकरी नागरिक सांगत आहेत. केवळ ठेकेदारच्या नाकर्तेपणामुळे यास कारणीभूत असून, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई करून कोण..? देणार असा प्रश्न विचारला जात आहे. रुद्राणी कंट्रक्शन कंपनीच्या बेजवाबदार कारणीभूत असल्याबद्दल कारवाई करण्यात यावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देऊन नुकसान भरपाई मिळावा अशी मागणी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष गजानन ठाकरे यांनी केली आहे. अन्यथा ठेकेदारच्या विरोधात आंदोलन पुकारावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.


हिमायतनगर तालुक्यातील जवळगावला पुराणे वेढले असून, या भागातील शेकडो एकर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे तर गावातील काही घरात पण शिरले असून, अनेक घरांना पुराचा वेडा आहे. त्यामुळे जनजीवन विसकळीत झाला असून, झालेल्या मुसळधार पावसाची आणि नुकसानीची पाहणी करून प्रशासनाने भरपाई मिळून द्यावी अशी मागणी जोर धरत आहे. 


पुलाच्या अर्धवट कामामुळे पाणी जायला मार्ग नसल्याने हिमायतनगर तालुक्यातील जवळगावला पुराणे वेढले असून, या भागातील शेकडो एकर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर गावातील काही घरात पण शिरले असून, अनेक घरांना पुराचा वेडा आहे. त्यामुळे जनजीवन विसकळीत झाला असून, या भागात झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी पैनगंगा नदीला आल्याने नदीकाठावरील घारापुर, पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली, एकंबा, सिरंजनी परिसरातील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. शेलोडा भागात तर सोयाबीन पूर्णतः आडवे झाले असून, सडून गेल्याने पिकाची अवस्था पाहून शेतकऱ्यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. आजची हा पाऊस अतिवृष्टीपेक्षा जास्त असल्याने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांनी देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी सटवाजी पवार, राजू पाटील सिरपल्लीकर, चांदराव वानखेडे, रामराव शिंदे, बाळू पाटील विरसनीकर, ज्ञानेश्वर माने पारवेकर, आदींसह नदीकाठावरील गावकरी वर्गातून जोर धरत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी