शालेय निधीत गैरव्यवहार झाल्याचा
हिमायतनगर| शहरातील अकरावरील जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक शाळेच्या अध्यक्ष सचिवांकडून शासनाने दिलेल्या निधीत गैरव्यवहार केला असून, काम पूर्ण होण्याअगोदर चक्क सव्वादोन लक्ष रुपये उचलल्याचा आरोप शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षांनी पत्रकारांशी बोलतांना केला आहे. या संदर्भात समितीच्या सदस्यांनी दि.१८ रोजी नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षाताई ठाकूर यांच्याकडे तक्रार करून निधीच्या अफरा तफर प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कठोर कार्यवाही व्हावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सय्यद अलीम सय्यद साजिद यांनी जिल्हा परीषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सन 2018 - 19 मध्ये शालेय व्यवस्थापन समिती स्थापन झाली, शासनाने सन 2018 - 21 मध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशा करिता दिलेले पैसे शालेय व्यवस्थापन समितीचा ठराव न घेता, समितीला विश्वासात न घेता, मुलांना गणवेश न देता, किंवा त्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग न करता परस्पर पणे अध्यक्ष सचिवांनी रक्कम हडप केली असल्याचा आरोप केला आहे.सन 2020 मध्ये शाळेच्या दुरूस्ती करीता अंदाजित रक्कम नऊ लक्ष खात्यावर आली होती, याहि रक्कमेच्या कामात गैरव्यवहार झाला असल्याचे त्यांचे म्हणने आहे. तसेच गट शिक्षण अधिकारी यांनी निर्देशित केलेल्या नवीन शालेय समिती स्थापन करण्याचे आदेशित केले, असताना सुद्धा तसे न करता काही शालेय समिती च्या लोकांना हाताशी धरून गैरमार्गाने अध्यक्ष व सचिव यांनी शासनाने दिलेल्या पैशाची अफरातफर केली आहे.
सदरच्या झालेल्या गैरव्यवहाराची तोंडी तक्रार गटशिक्षणाधिकारी हिमायतनगर यांना केली असता कुठलीही कारवाई न करता उडवाउडवीची उत्तरे दिली. संबंधितास पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी ठाकुर यांचेकडे धाव घेतली. उपाध्यक्षाने अध्यक्ष व सचिव यांचेवर केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपाची चर्चा शहरासह तालुक्यात होत आहे.या निवेदनावर दत्ता तुंगेवाड, शे. इफतेखार शे. हुसेन, आलिया बेगम शे. नयुम, कुलुसुमबी म. शफि, अ.हफीज अ. अजीस, माजिया बेगम अ.रब, स. अलीम स साजिद, एजाज उर रहमान उल्लू रहेमान यांच्या सह्या आहेत. अश्याच प्रकारचा कारभार तालुक्यातील अनेक शाळांमध्ये होत असताना गटशिक्षण अधिकारी नांदेडला राहून उंटावरून शेळ्या हाकतात आणि आपल्या स्वार्थासाठी भ्रष्टाचार्यांना पाठीशी घालतात असे अनेक ठिकाणच्या शेळी व्यवस्थापन समितीच्या सदस्यांचे आरोप आहेत.