उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोंडेकर यांचे आयटकला आश्वासन
नांदेड| एप्रिल 2014 पासूनचे थकीत वेतन व 2007 पासूनचा थकित राहणीमान भत्ता अदा करण्याबाबत. आठ दिवसाच्या आत कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोंडेकर यांनी आयटक प्रणित नांदेड जिल्हा ग्राम पंचायत कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळास दिले. या आश्वासनावर आयटकने सुरु केलेले बेमुदत धरणे आंदोलन तात्पुर्ते स्थगित केले आहे.
ग्राम पंचायत कर्मचार्यांचा एप्रिल 2014 पासून अर्धा पगार थकीत ठेवण्यात आलेला आहे. तो त्वरीत अदा करावा, त्याच प्रमाणे 2007 पासूनचा थकीत राहणीमान भत्ता वाटप करावा या व इतर मागण्यांसाठी शनिवार दि.15 पासून संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले होते. या संदर्भात पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोंडेकर यांनी संघटना प्रतिनिधींशी चर्चा करुन वरील आश्वासन दिले.यावेळी कॉ.प्रदीप नागापूरकर, कॉ.शिवाजी फुलवळे, कॉ.किशनराव पावडे, कॉ.परसराम मुंडे, कॉ.हणमंत मगरे, कॉ.नागोराव पुयड, कॉ. हर्षवर्धन आठवले, कॉ. रावसाहेब धोतरे, कॉ.शिवाजी शेजुळे, कॉ.देवानंद पाटील, कॉ.लक्ष्मण आवळे, कॉ. रुक्माजी लांडगे, कॉ.एकनाथ गणगे, कॉ.चंद्रकांत पावडे, कॉ.शिवराम सुर्यवंशी, कॉ. माधव भिसे, कॉ.बाबुराव जोगदंड, कॉ.रामा मुळे, कॉ.माधवराव जनकवाडे, कॉ.लिंबाजी आरसुळे, कॉ.संतोष लोकडे, कॉ.सुदाम सोनटक्के, कॉ.संभाजी चित्ते, कॉ.सिद्धार्थ सुपे यांनी चर्चेत सहभाग घेतला.
नांदेड| एप्रिल 2014 पासूनचे थकीत वेतन व 2007 पासूनचा थकित राहणीमान भत्ता अदा करण्याबाबत. आठ दिवसाच्या आत कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोंडेकर यांनी आयटक प्रणित नांदेड जिल्हा ग्राम पंचायत कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळास दिले. या आश्वासनावर आयटकने सुरु केलेले बेमुदत धरणे आंदोलन तात्पुर्ते स्थगित केले आहे.
ग्राम पंचायत कर्मचार्यांचा एप्रिल 2014 पासून अर्धा पगार थकीत ठेवण्यात आलेला आहे. तो त्वरीत अदा करावा, त्याच प्रमाणे 2007 पासूनचा थकीत राहणीमान भत्ता वाटप करावा या व इतर मागण्यांसाठी शनिवार दि.15 पासून संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले होते. या संदर्भात पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोंडेकर यांनी संघटना प्रतिनिधींशी चर्चा करुन वरील आश्वासन दिले.यावेळी कॉ.प्रदीप नागापूरकर, कॉ.शिवाजी फुलवळे, कॉ.किशनराव पावडे, कॉ.परसराम मुंडे, कॉ.हणमंत मगरे, कॉ.नागोराव पुयड, कॉ. हर्षवर्धन आठवले, कॉ. रावसाहेब धोतरे, कॉ.शिवाजी शेजुळे, कॉ.देवानंद पाटील, कॉ.लक्ष्मण आवळे, कॉ. रुक्माजी लांडगे, कॉ.एकनाथ गणगे, कॉ.चंद्रकांत पावडे, कॉ.शिवराम सुर्यवंशी, कॉ. माधव भिसे, कॉ.बाबुराव जोगदंड, कॉ.रामा मुळे, कॉ.माधवराव जनकवाडे, कॉ.लिंबाजी आरसुळे, कॉ.संतोष लोकडे, कॉ.सुदाम सोनटक्के, कॉ.संभाजी चित्ते, कॉ.सिद्धार्थ सुपे यांनी चर्चेत सहभाग घेतला.