विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह आरोग्याची काळजी
घेण्याच्या आश्रम शाळा प्रशासनाला सूचना
हिमायतनगर (अनिल मादसवार) स्वादिष्ठ जेवणाबरोबर शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आणि आश्रम शाळेतील विद्यार्थी - विद्यार्थिनीच्या आरोग्याची जबादारी ही प्रशासनाची आहे. हे लक्षात घेऊन शासनाच्या सर्व सोई - सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात यात हयगय करणाऱ्यांची कदापि गय केली जाणार नाही अश्या सक्त सूचना आ. नागेश पाटील आष्टीकर यांनी संबंधितांना दिल्या.
हिमायतनगर (अनिल मादसवार) स्वादिष्ठ जेवणाबरोबर शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आणि आश्रम शाळेतील विद्यार्थी - विद्यार्थिनीच्या आरोग्याची जबादारी ही प्रशासनाची आहे. हे लक्षात घेऊन शासनाच्या सर्व सोई - सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात यात हयगय करणाऱ्यांची कदापि गय केली जाणार नाही अश्या सक्त सूचना आ. नागेश पाटील आष्टीकर यांनी संबंधितांना दिल्या.
ते दि. 01 जुलै रोजी महाराष्ट्र्र राज्य आदिवासी विकास विभागाच्या शासकीय माध्यमिक आश्रम शाळा एकाघरी येथील नूतन इमारतीचे उदघाटन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी आविशकुमार सोनोने, तहसीलदार गजानन शिंदे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाबुराव कदम, हदगाव प.स.सभापती बाळासाहेब कदम, मंडळ कृषी अधिकारी जाधव, तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, सत्यव्रत ढोले, राम राठोड, आदींसह अनेकांची उपस्थित होती. निसर्गरम्य परिसरात असलेल्या आदिवासी आश्रम शाळा व मुला - मुलीचे वसतिगृहाच्या नूतन इमारतीसाठी जवळपास 5 कोटीचा निधी खर्च करून उभारण्यात आले आहे. याचा उदघाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर वनविभागाच्या वतीने आयॊजीत 200 हून अधिक झाडे लावण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी येथील विद्यार्थी - विद्यार्थिनींना वृक्ष संवर्धनाची शपथ देण्यात आली. यावेळी आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी वसतिगृह व शाळेच्या इमारतीच्या कामाची व सोई सुविधांची पाहणी केली.
दरम्यान येथे स्वच्छता, विद्यार्थी - विद्यार्थींना पुस्तकाचा अभाव, पाण्याची समस्या, पिण्याचे शुद्ध पाणी, शाळेचे अर्धवट सुरक्षा भिंत आणि महिला अधीक्षक व सफाई कामगाराची कमतरता दिसून आली. तसेच निवासी विद्यार्थिनीच्या सुरक्षेसाठी येथील क्वार्टरमध्ये महिला शिक्षकांनी स्थानिकला राहून आपले कर्तव्य बजवावे आणि मुला - मुलींना स्वच्छ, उत्तम आहार व शासनाकडून उपलब्ध होणारे मेनूवर जेवण देण्यात यावे अश्या सूचना प्रभारी मुख्याध्यापक एम.एच राठोड, वरदान व्ही.बी.नहारे यांना केल्या. तसेच विद्यार्थी - विद्यार्थ्यांनींना कोणत्याही जेवणासह कोणत्याही बाबीची कमतरता अथवा अडचणी भासल्यास कोणतीही भीती न बाळगता थेट संपर्क करण्याचे आवाहन करून सर्वाना मोबाईल क्रमांक दिला. तसेच याबाबत संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून तातडीने महिला अधीक्षक, सफाई कामगार नियुक्त करून पिण्याच्या शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी मदनराव पाटील, बंडू पाटील आष्टीकर, संजय काईतवाड, विठ्ठल ठाकरे, प्रकाश जाधव, पाटकर अनिल मादसवार, साईनाथ धोबे, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.