उपकेंन्द्र उदघाट्नच्या प्रतीक्षेत

पळसपुर - वडगांव येथील ३३ के व्हि उपकेंन्द्र
 उदघाट्नच्या प्रतीक्षेत
हिमायतनगर (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या पळसपुर व वडगांव ज.येथील नव्याने उभारण्यात आलेल्या ३३ कें व्हि उपकेंन्द्राची चाचणी पूर्ण होऊन 15 दिवस लोटले असून, उदघाट्नच्या प्रतीक्षेत आहे. 

आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्या पाठपुराव्यामुळे गतवर्षी पळस पूर, वडगाव ज.येथे 33 केव्हीचे उपकेंद्र मंजूर झाले. याची निर्मिती इन्फ्रा कंपनीच्या माध्यमातून तब्बल 5 कोटीच्या खर्चातून नांदेड येथील कंठेवाड नामक ठेकेदाराकरवी करण्यात आले. गत 15 दिवसापूर्वी या दोन्ही उपकेंद्राचे चाचणी वरिष्ठ अभियंत्यांनी केली असून, अद्याप याचे उदघाटन झाले नसल्याने परिसरातील नागरिकांना भर पावसाळ्यात खंडित वीज पुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. या उपकेंद्रात चाचणी पूर्ण झाल्यानंतर वीज पुरवठा येथील रोहित्रात आला आहे. मात्र उदघाटना अभावी वीज ग्राहकाना वीजेचा पुरवठा होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. ग्रामीण भागात उपकेंद्राची निर्मिती होऊनसुद्धा हिमायतनगर येथील उपकेंद्रांद्वारे ग्रामीण भागात वीजपुरवठा होत असल्याने वादळी वारे, पावसाच्या  काळात विजेचा लपंडाव होऊन वीजग्राहकाना अडचणींचा सामना करत रात्र अंधारात काढावी लागत आहे. या ठिकाणी कर्मचारयांच्या अभाव असल्यामुळे सदरचे वीज केंद्र शोभेची वस्तू बनल्याच्या संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरीकातून केल्या जात आहेत. ही बाब लक्षात घेता तात्काळ वीजकेंद्राचे उदघाटन करून पळसपुर वीजकेन्द्राअंतर्गत पळसपुर, डाेल्हारी, सिरपल्ली, शेल्लाेडा, सिंरजनी, एकंबा, काैठा, तर वडगांव ज. वीजकेन्द्रा अंतर्गत मंगरूळ, सिंबदरा, वारंगटाकळी, धानाेरा, खैरगांव, बाेरगडी, सिबदरा, वडगाव सह अन्य गावच्या नागरिक व शेतकर्याना सुरळीत व सुरक्षित विज पुरवठा करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

कामाच्या साशंकतेमुळे उदघाटन करण्यास विलंब...!

सदरचे काम करताना संबंधित ठेकेदाराने निकृष्ठ साहित्य व हलक्या दर्जाचे मटेरियल वापरल्याचे ओरड नागरिकांनी केली होती. परंतु नागरिकांच्या सूचना तक्रारींकडे गुत्तेदाराने दुर्लक्ष करून वरिष्ठ अभियंते व राजकीय नेत्यांशी संगनमत करून थातुर - मातुर पद्धतीने काम पूर्णत्वास नेले. याबाबतचे वृत्त अनेक दैनिकातून प्रकाशित होऊन सुद्धा याची चौकशी तर सोडाच कोणत्याही वरिष्ठ धिकाऱ्यानी भेट देऊन पाहणी सुद्धा केली नाही. त्यामुळे नव्याने बांधण्यात आलेले विद्दुत उपकेंद्र वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा देऊ शकेल काय याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. म्हणूनच की काय..? काम पूर्ण होऊन सुद्धा या दोन्ही उपकेंद्राचे उदघाटन करण्यास विलंब होतोय..? स सवाल नागरिक विचारीत आहेत. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी