काँग्रेस म्हणजे ....... पार्टी..
बहुजन मुस्लिम मतदारातील चर्चा
हदगाव / हिमायतनगर(वार्ताहर)दलित आणि मुस्लिम मतदारांना आपली वोट बैंक समजणाऱ्या काँग्रेसला एकाला चलोचा फंडा हदगाव / हिमायतनग विधानसभा मतदार संघात महागात पडण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या पाच वर्षात झालेल्या विकासाचा गवगवा होत असला तरी हा विकास सोयर संबंधाचा झाल्याच्या प्रतिक्रिया बहुजन समाजातील मतदारामधून उमटत आहेत.
काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी मतदार संघाच्या नावाखाली सोयर्या धायर्यांचा विकास जोमाने केला असल्याचे अनेक मतदारातून सांगण्यात येत आहे. परिणामी वोट बैंक समजली जाणारी दलित, मुइस्लिम, ओबीसी मतांची काँग्रेस ची टक्केवारी हळू हळू घसरताना दिसत आहे. सर्वसमान्य तला गाळातील मतदारांचा वापर केवळ निवडणुकी पुरताच होत असल्याने आता काँग्रेस पक्ष म्हणजे पाटलांची पार्टी झाल्याच्या छुपा प्रचार अनेक कार्यकर्ते करत आहेत. केवळ सत्तेसाठी इतरांना गृहीत धरत मलिदा लाटण्यासाठी मात्र सोयरे - धारये अश्या संतप्त प्रतिक्रिया ऐकावयास मिळत असल्याने बहुजन समाजातील मतदार या वेळेस काँग्रेसला हात दाखविण्याच्या तयारीत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
एवढेच नव्हे तर आमदारांच्या चेल्या - चपाट्यानी भरमसाठ प्रमाणात मिळालेल्या निधीवर डल्ला मारला असल्याचे अनेक निकृष्ठ विकास कामावरून दिसून येत आहे. त्यामुळे विकासाची डोंगरावर मात्र सोयर्यांचे शिखर उभे झाले असल्याचा आरोप विरोधकाकडून करण्यात येत असल्याने काँग्रेसच्या मुस्लिम, दलित, वोट बैन्केतील बैलन्स कमी होऊ लागले आहे.
काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी मतदार संघाच्या नावाखाली सोयर्या धायर्यांचा विकास जोमाने केला असल्याचे अनेक मतदारातून सांगण्यात येत आहे. परिणामी वोट बैंक समजली जाणारी दलित, मुइस्लिम, ओबीसी मतांची काँग्रेस ची टक्केवारी हळू हळू घसरताना दिसत आहे. सर्वसमान्य तला गाळातील मतदारांचा वापर केवळ निवडणुकी पुरताच होत असल्याने आता काँग्रेस पक्ष म्हणजे पाटलांची पार्टी झाल्याच्या छुपा प्रचार अनेक कार्यकर्ते करत आहेत. केवळ सत्तेसाठी इतरांना गृहीत धरत मलिदा लाटण्यासाठी मात्र सोयरे - धारये अश्या संतप्त प्रतिक्रिया ऐकावयास मिळत असल्याने बहुजन समाजातील मतदार या वेळेस काँग्रेसला हात दाखविण्याच्या तयारीत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
एवढेच नव्हे तर आमदारांच्या चेल्या - चपाट्यानी भरमसाठ प्रमाणात मिळालेल्या निधीवर डल्ला मारला असल्याचे अनेक निकृष्ठ विकास कामावरून दिसून येत आहे. त्यामुळे विकासाची डोंगरावर मात्र सोयर्यांचे शिखर उभे झाले असल्याचा आरोप विरोधकाकडून करण्यात येत असल्याने काँग्रेसच्या मुस्लिम, दलित, वोट बैन्केतील बैलन्स कमी होऊ लागले आहे.