अघोषित भारनियमनामुळे दुर्गामंडळ व शेतकरी त्रस्त
हिमायतनगर(वार्ताहर)सध्या सन उत्सवाची धामधूम सर्वत्र चालू असताना विजेच्या लपंडावामुळे दुर्गामंडळ व शेतकरी कमालीचा त्रस्त झाला आहे. एकीकडे वीज बिलासाठी ताकद लावणारी महावितरण कंपनी मात्र सुरळीत वीजपुरवठा देण्यात अपयशी ठरत असल्याचे यावरून दिसत आहे.
नवरात्रोत्सवात देवीच्या भक्तांना विजेच्या लपंडावामुळे आयोजित कार्यक्रमात व्यत्यय निर्माण होत असून, लाईटच्या क्षणाचा भरवसा नाही कधी येईल आणि कधी जाईल त्यासाठी अगोदरच जनरेटरची व्यवस्था लावा असे उद्गार अनेक दुर्गा मंडळाच्या पदाधिकार्यांच्या तोंडून निघत आहेत. हिमायतनगर शहर व ग्रामीण परिसरात ४० हून अधिक ठिकाणी दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करून भक्त मंडळीद्वारे विविध सामाजीक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल सुरु आहे. परंतु उत्सवाच्या या रंगात महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्यांच्या नाकर्तेपणामुळे भक्तांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच अनेक दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने नुकसानीत येणाऱ्या पिकांना विहीर- बोअरचे पाणी देताना शेतकऱ्यांच्या नाके नऊ येत आहेत. कारण महावितरण कंपनीची अघोषित भारनियमन केले जात असल्यामुळे वीजपंप बंद होत असल्याने शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहेत. अनेक वेळा महावितरण कंपनीच्या संबंधित कनिष्ठ अभियंता व लाईनमन यांना सूचना देवूनही काहीच उपयोग होत नसल्याने शेतकरी व दुर्गा मंडळाच्या युवकांनी संताप व्यक्त केला आहे. तर काही मंडळाच्या युवकांनी महावितरण कंपनीचे कार्यालय गाठून उत्सवात वीज पुरवठा सुरळीत पुरवठा करावा अशी मागणी केली. तरी देखील विद्दुत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार सुरु असल्याने महावितरण कंपनीच्या विरोधात शेतकरी व दुर्गा मंडळाचे पदाधिकारी यल्गार पुकारण्याच्या तयारीत आहेत.
नवरात्रोत्सवात देवीच्या भक्तांना विजेच्या लपंडावामुळे आयोजित कार्यक्रमात व्यत्यय निर्माण होत असून, लाईटच्या क्षणाचा भरवसा नाही कधी येईल आणि कधी जाईल त्यासाठी अगोदरच जनरेटरची व्यवस्था लावा असे उद्गार अनेक दुर्गा मंडळाच्या पदाधिकार्यांच्या तोंडून निघत आहेत. हिमायतनगर शहर व ग्रामीण परिसरात ४० हून अधिक ठिकाणी दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करून भक्त मंडळीद्वारे विविध सामाजीक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल सुरु आहे. परंतु उत्सवाच्या या रंगात महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्यांच्या नाकर्तेपणामुळे भक्तांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच अनेक दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने नुकसानीत येणाऱ्या पिकांना विहीर- बोअरचे पाणी देताना शेतकऱ्यांच्या नाके नऊ येत आहेत. कारण महावितरण कंपनीची अघोषित भारनियमन केले जात असल्यामुळे वीजपंप बंद होत असल्याने शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहेत. अनेक वेळा महावितरण कंपनीच्या संबंधित कनिष्ठ अभियंता व लाईनमन यांना सूचना देवूनही काहीच उपयोग होत नसल्याने शेतकरी व दुर्गा मंडळाच्या युवकांनी संताप व्यक्त केला आहे. तर काही मंडळाच्या युवकांनी महावितरण कंपनीचे कार्यालय गाठून उत्सवात वीज पुरवठा सुरळीत पुरवठा करावा अशी मागणी केली. तरी देखील विद्दुत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार सुरु असल्याने महावितरण कंपनीच्या विरोधात शेतकरी व दुर्गा मंडळाचे पदाधिकारी यल्गार पुकारण्याच्या तयारीत आहेत.