मतदारात जागरूक व्हावे

ग्रामीण जनतेत मतदानाविषयी जागरुकता निर्माण व्हावी..दिलीप स्वामी 


हिमायतनगर(अनिल मादसवार)जगात आपल्या देशाची लोकशाही बळकट असून, ती आणखीन बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा. विशेषता ग्रामीण भागातील प्रत्येक मतदार जागरूक व्हावे असे मत स्वीप अभियानाचे समन्वयक तथा अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले. ते   हिमायतनगर येथील तहसील कार्यालयात अधिकारी, कर्मचारी व पत्रकारांच्या दि.२३ रोजी आयोजित चर्चासत्र बैठकीप्रसंगी बोलत होते. यावेळी तहसीलदार शरद झाडके, नायब तहसीलदार गायकवाड उपस्थित होते. 

किनवट येथील दौर्यावरून परत जाताना हिमायतनगर येथील तहसील कार्यालयात विधानसभा मतदार संघात मतदान जनजागृती या अभियानाच्या अंमलबजावणीत सुसूत्रता रहावी यासाठी तालुका स्तरावरील अधिकारी - कर्मचार्यांना सूचना व मार्गदर्शन करण्यासाठी ते आले होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, लोकांनी मतदानाकडे पाठ फिरविल्यामुळे लोकशाही धोक्यात येऊ शकते. सन २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत फक्त ५० टक्के मतदान झाले होते. त्यामुळे मात्दारामध्ये जनजागृती निम्रमण करून टक्केवारी वादह्विण्यास्तही प्रयत्न झाले. लोकसभा निवडणुकीत ७० टक्के मतदान होणे आपेक्षित होते. मात्र 10 टक्के वाढ होऊन ६०  टक्के मतदान झाले होते. आगामी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत असे होऊ नये म्हणून जिल्हाभरात मतदान जनजागृती चळवळ गतिमान करण्यात आली असून, तालुका व ग्रामीण भागात जनजागरण करण्यासठी तीन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यात तलाठी, ग्रामसेवक, विविध प्रशासकीय कर्मचारी सामान्य जनतेपर्यंत जावून मतदानाबाबत माहिती देऊन मतदानाचा हक्क बजावण्याबाबत प्रेरित करणार आहेत. आगामी काळात दि. २९ सप्टेंबर ते १४ आँक्टोंबर २०१४ या कालावधीत विविध उपक्रम राबविले जाणार असून, यात सायकर रॅली, जनजागरण कार्यक्रम, मतदार जागृती ज्योत, पदयात्रा, मतदानाची शपथ, प्रभातफेरी, महिला बचत गट मेळावे, रांगोळी स्पर्धा, शाळा-महाविद्यालयांत मतदार जागृती दिवस, वादविवाद स्पर्धा, व्याख्याने, ज्येष्ठ नागरिकांसाठी मतोत्सव, हस्ताक्षर स्पर्धा, मॅरेथाँन, मेंहदी, संकल्पपत्रे वाटप व मतदान यंत्र आदी   प्रात्यक्षिकांचा समावेश आहे.

वोट फॉर रण अभियान राबविले जाणार 
------------------------------------------
पूर्वीच्या काळी रस्ते तथा दळण -वळणाची साधने नव्हती, मात्र ८० ते ९० टक्के मतदान होत होते. आजच्या काळात सर्व साधने उपलब्ध झाली. प्रत्येक घरात टी.व्ही. आली, लोक सुशिक्षित झाले, मात्र मतदानाची टक्केवारी घसरली आहे. हि दुर्दैवाची बाब आहे. बहुतांशी ठिकाणचे नागरिक मतदानाच्या दिवशी पर्यटनाची सहल काढतात मात्र मतदान करीत नाहीत. अश्या पद्धतीने दाखविली जाणारी अनास्था हि लोकशाहीसाठी घटका असून, जनतेत जनजागृती व्हावी यासाठी तालुकास्तरावर वोट फॉर रण...हि मोहीम राबविण्यात येणार आहे. या सायकल रेलीत कोलेजचे विद्यार्थी सहभाग घेऊन मोहीम राबवीत मतदारांना आकर्षित करतील.     

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी