यावेळी प्रमुख रश्मी ताई वडवळकर ,अखिल भारतीय नाट्य परिषदे उपाध्यक्ष तर अध्यक्ष म्हणून नगरसेविका सौ मंगलाताई गजानन देशमुख,हे होते तर परिक्षक म्हणून सुहास देशपांडे, स्वाती देशपांडे, अनुराधा पत्की यांनी काम पाहिले. या नाट्य महोत्सव आठ संंघानी सहभाग नोंदविला यात हिंगोली, परभणी, नांदेड संघांनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धा मध्ये पहिला क्रमांक हत्याग्राम, नाटक कामगार कल्याण केंद्र चौफाळा बक्षीस ५०००/ रुपये धनादेश व प्रमाण पत्र ,तर दुसरा शेतकरी आत्महत्या, ललीतकला भवन परभणी, ३०००/रुपये धनादेश तिसरा यादा यादही धर्मश ललीत कला भवन नांदेड २०००/रुपये धनादेश सहभागी झालेल्या सादरीकरण संघाला प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात आले.
यावेळी उत्कृष्ट दिग्दर्शन परभणी चा विजया पंडित कातकडे, व्दितीय श्रेयस कुलकर्णी,तिसरा कविता प्रशांत माहेवार,तर अभिनय मध्ये विजया कातकडे,व्दितीय प्रिया मोरे,तृतीय वसुधा भांनेगावकर या पारितोषिक प्रमाणपत्रे ऊपसिथीत मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.तर उर्वरित कामगार कल्याण केंद्र मुदखेड कोवहीड ९०, सिडको केंद्र बालपण हरवले, कामगार कल्याण केंद्र मिलगेट स्त्री भ्रूणहत्या, वसमत यांनी क्षितीजा पलीकडे , हिंगोली बदलत्या जीवनशैलीमुळे होणा-या आजारांपासून बचाव या नाटकाचे सादरीकरण केले.
नाट्य महोत्सव यशस्वी करण्यासाठी कामगार अधिकारी प्रसाद धस, केंद्र संचालक एस ,आर.फाळके, गजानन भोसिकर,विलास मेडंके, सविता पांडे , स्वाती भरकड,शौभा वाघमारे, अर्चना शिवणखेडकर, चौधरी, गंगाबाई परिट यांनी परिश्रम घेतले. सध्याचा परिस्थितीत झटपट अमिषाला बळी पडत असुन, अनेक स्वप्न पूर्ण होण्याचा दृष्टीने युवक युवती बळी पडत असुन त्या वर आधारित हत्या ग्राम या नाटकात सादरीकरण करुन ऊपसिथीत मान्यवरांच्ये मने जिंकणारा चौफाळा नांदेड येथील कामगार कल्याण मंडळ नांदेड ने सादरीकरण केलेल्या दिग्दर्शक श्रेयस कुलकर्णी यांच्या नाटकास प्रथम पारितोषिक मिळाले आहे,या नाट्य महोत्सवास नागरिक व युवक युवती यांच्यी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.