नांदेड|विद्यार्थ्यांनी दररोज शाळेत यावे,सातत्यपुर्ण खूप अभ्यास करून रिकाम्या वेळेचा सदुपयोग करावा,जीवनात वक्तशीरपणा,सकारात्मकता,आत्मविश्वास व चिकाटी ठेवून परिश्रम करीत मोठे होण्यासाठी महत्त्वाकांक्षा बाळगण्याचे आवाहन नांदेड जि.प.च्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती रेखाताई काळम (कदम )यांनी केले .
लोहा तालुक्यातील डेरला येथे २३ रोजी राष्ट्रीय पोषण सप्ताह निमित्ताने महिला व बालकाच्या पोषण विषयक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर(घुगे) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात महिला आणि स्वास्थ्य ,बालक आणि शिक्षण ,लिंग संवेदनाशील -जलसंधारण आणि व्यवस्थापन ,आदिवासी महिला आणि मुलांसाठी पारंपरिक खाद्यपदार्थ आदि विषयाच्या अनुषंगाने जिल्हाभरात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
त्या निमिताने आज अकस्मित डेरला शाळा अंगणवाडीची पाहणी करून शाळेत आयोजित कार्यक्रमात पुढे बोलताना श्रीमती रेखाताई काळम (कदम) म्हणाल्या ग्रामीण महिला आज स्वावलंबी होत आहेत .शिक्षणामुळे बालविवाहाचे प्रमाण नाहीसे होत आहे .त्यासाठी "बेटी बचाव,बेटी पढाओ" सांगून पुरूषांनी महिला व बालकांचे मनोधैर्य वाढविण्याचे सांगून गाव आणि गाव परिसर सुंदर आहेच पण अधिक सुंदर राखण्याचे सातत्यपुर्ण प्रयत्न करावेत असेही सांगितले .भेटीत अंगणवाडीतील व शाळेतील बालकांना मुक्तपणे संवाद साधून आनंद निर्माण केला.काही चिमुकल्यांना कडेवर उचलून घेऊन तर काहीना बोटधरून ,पाठीवर थाप देऊन प्रोत्साहन दिले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुशिलकुमार शिंदे तर प्रमुख उपस्थिती उपसरपंच उमाकांतराव शिंदे ,विभागीय कार्यालयाच्या राजमाता जिजाऊ उपक्रमाच्या अधिकारी श्रीमती ऐश्वर्या लोनकर, तालुका महिला बालविकास अधिकारी प्रणय चटलावार,राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक पंडित पवळे ,अंंगणवाडी पर्यवेक श्रीमती पांडागळे,उत्तमराव शिंदे ,बालाजीराव पाटील आदि उपस्थित होते ,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ शिक्षक उत्तम क्षीरसागर,दत्तात्रय पांचाळ,सौ.मनिषा पवार ,सौ.दिपाली सनपूरकर, सौ.अंजली भंडे,सौ.ज्योती हंबर्डे ,अंगणवाडी सेविका सौ.कौशल्याताई शिंदे यांनी परिश्रम घेतले .सुरेख सुत्रसंचालन उत्तम क्षीरसागर यांनी मानले .