नायगाव/नांदेड। भोवतालचे वातावरण पार बिघडून गेले आहे. या वातावरणाच्या वावटळीत स्वतः लेखकही सापडलेला आहे. तोही या अवकाशात गिरक्या घेत आहे. परंतु तो सजग आहे.. आणि ही सजगता ठेवूनच सर्व अनुभवांची आणि जाणिवांची- संवेदनाची जंत्री एकत्रित करीत 'शाळा' ही कादंबरी लेखक ज्ञानेश्वर शिंदे गागलेगावकर यांनी आपल्या हाती दिली आहे. ती आता आपणाला तेवढ्याच सजगतेने समजून घ्यावी लागेल असे उद्गार प्रसिद्ध कादंबरीकार बाबू बिरादार यांनी काढले.
नायगाव/नांदेड। भोवतालचे वातावरण पार बिघडून गेले आहे. या वातावरणाच्या वावटळीत स्वतः लेखकही सापडलेला आहे. तोही या अवकाशात गिरक्या घेत आहे. परंतु तो सजग आहे.. आणि ही सजगता ठेवूनच सर्व अनुभवांची आणि जाणिवांची- संवेदनाची जंत्री एकत्रित करीत 'शाळा' ही कादंबरी लेखक ज्ञानेश्वर शिंदे गागलेगावकर यांनी आपल्या हाती दिली आहे. ती आता आपणाला तेवढ्याच सजगतेने समजून घ्यावी लागेल असे उद्गार प्रसिद्ध कादंबरीकार बाबू बिरादार यांनी काढले.