किनवट, माधव सूर्यवंशी| रक्तदान हे श्रेष्ठदान आहे ही, जाण ठेवून आपण केलेल्या रक्तदानातून एखाद्याचा जीव आपण वाचू शकतो तरुणांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा. असे आव्हान श्रीराम गणेश मंडळ येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमात बोलताना रक्तदान शिबिराचे आयोजक धीरज नेम्मानिवार यांनी व्यक्त केले.
किनवट शहरातील रामनगर भागात श्रीराम गणेश मंडळाच्या वतीने व रक्तदान शिबिराचे आयोजक धीरज नेम्मा निवार व शाई तिरमनवार मित्रमंडळाच्या वती आयोजित रक्तदान शिबिरात आज दुपारपर्यंत ४७ रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. नांदेड येथील गोवळकर गुरुजी रक्तपेढी यांचे मुकुंद धानोरकर रामा महाजन बालाजी शिंदे उदय राऊत कांता कद्दूरवार गायत्री परदेशी दमयंती बातचे विठ्ठल हेडे आधी या रक्तदान शिबिरात सहभा होते.. त्यात रामनगर भागातील तरुणांनी मोठा सहभाग घेऊन एक हे रक्तदान शिबिर यशस्वी करीत होते. या रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी श्रीराम गणेश मंडळांच्या पदाधिकारी यांचे योगदान होते.