नविन नांदेड। नांदेड जिल्ह्यातील संततधार पावसामुळे शेतकऱ्यांची पिकांची नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नांदेड तालुक्यातील विष्णुपुरी शेतातील पिक पाहणी प्रसंगी केले.
राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी विष्णुपुरी शिवारातील शेतातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी दि.२१ आगसष्ट रोजी केली. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर,नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे,ऊतरचे आमदार बालाजी कल्याणकर, यांच्या सह जिल्हा कृषी अधिकारी,परिसरातील शेतकरी बांधव यांच्या सोबत चर्चा केली.
संततधार पावसामुळे नांदेड तालुक्यातील विष्णुपुरी शिवारातील शेतकरी बांधवांचे ४२४ हेक्टर जमिनीवरील पिंकांचे नुकसान झाले ,यांच्यी पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे २१आगसष्ट रोजी नांदेड येथील नियोजन भवन येथे पिक परिस्थिती आढावा बैठक घेतल्या नंतर प्रत्यक्ष त्यांनी विष्णुपुरी येथील मनाठकर शेतकरी यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली. यावेळी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसोबत चर्चा केली, विष्णुपुरी संरपच प्रतिनिधी राजु हंबर्डे यांनी सरसकट शेतकरी बांधवांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली. तर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतात जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी करून शेतकरी भगवान देवराव हंबर्डे, शिवाजीराव हंबर्डे, बाबुराव दतराव हंबर्डे यांच्या सह ऊपसिथीत शेतकरी बांधव यांच्या शी चर्चा करुन पिक लागवाडी साठी झालेला खर्च व शेतीविषयक प्रश्नावर चर्चा करून शेतकरी बांधवांना यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याचे सांगितले.
यावेळी नांदेडचे तहसीलदार किरण अंबेकर,मंडळ अधिकारी देवापुरकर, विभागीय कृषी सह संचालक साहेबराव दिवेकर,अधीक्षक कृषी अधिकारी आर एस पाटील,जिल्हा अधीक्षक मंडळ कृषी अधिकारी सावंत कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, तालुका कृषी अधिकारी एस,बी, मोकळे, गट विकास अधिकारी राजकुमार मुक्कावार,कृषी सहायक मुधोळकर,विष्णुपुरी संरपच प्रतिनिधी राजु हंबर्डे, मंडळ अधिकारी के.एम.नागरवाड, तलाठी देवापुरकर, ग्रामविकास अधिकारी संजय कानोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव हंबर्डे, ऊपसंरपच प्रतिनिधी विश्वनाथ हंबर्डे, यांच्या सह
शेतकरी भगवान देवराव हंबर्डे ,दिलीप पंढरीनाथ मनाठकर,संजय हंबर्डे, हरी सोनाजी हंबर्डे ,शिवाजी हंबर्डे,गोविंदराव हंबर्डे ,माधव हंबर्डे,राजू हंबर्डे, राजू भगवान हंबर्डे,नंदू हंबर्डे,विठलराव हंबर्डे, शंकरराव हंबर्डे व शेतकरी यांच्यी उपस्थिती होती. यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी करून शेतकऱ्यांचा सोबत चर्चा केली.