हिमायतनगर/उमरखेड| विदर्भ मराठवाड्यच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या वरील पातळीवर असलेल्या ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प ईसापूर धरणाचा दिनांक १८ जुळली रोजी दुपारी १ वाजता पाणी पातळी ४३८.६० मो. झाली असून, जिवंत पाणी साठा ७२२.२७ द.ल.घ.मो. (७४.९२%) ७५ % इतका झाला आहे. सद्यस्थितीत ईसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाउस पडत असल्याने धरणात पाण्याचा येवा होत आहे व पाणी पातळोत वाढ होत आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी इसापूर घरांचे दरवाजे मधून पाणीसाठा सोडण्याची शक्यता नाकारत येत नाही. त्यामुळे पैनगंगा नदीच्याकाठावरील गावांना दि.१८ रोजीचे पत्र क्रमांक जा.क्र.उपेप्रडवि1/पुरनियंत्रण/तांशा/३६८ दि.१८/०७/२०२ द्वारे सावधानतेचा ईशारा देण्यात आला आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले आहे.
इसापूर धरणात वरील पातळीवर सुरु असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे पाण्याचा येवा सुरु आहे. ईसापूर धरणाचा मंजुर जलाशय प्रचालन आराखडा (R.S.O.) (75% विश्वासार्हता नुसार) दिनांक ३१/०७/२०२२ पर्यंत पाणी पातळी ४४०.१२ मीटर (९१.४३ % ) ठेवावि लागणार आहे. आणि धरणात येणारे अतिरीक्त पाणी धरण सूरक्षीततेच्या दृष्टीने ईसापूर धरणातुन वक्रद्वारे उघडून (Spillway) सांडव्याद्वारे कोणत्याही क्षणी पेनगंगा नदीपात्रात सोडावे लागेल. त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पुर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
धरणामध्ये येणा-या पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे अथवा कमी करणे बाबतचा निर्णय वेळोवेळी घेण्यात येइल व तसे व्हाटसअंप ग्रुप द्वारे/ प्रमनध्वनी द्वारे अवगत करण्यात येईल. तरी संभाव्य पुराच्या पाण्यामुळे जिवित व वित्त हानी होऊ नये म्हणुन आपल्या तालुक्यातील नदी काठच्या दोन्ही तिरावरील गावातील नागरिकांना आपआपली गुरेढोरे, घरगुती ब शेती उपयोगी सामान सुरक्षित स्थळी ठेवणे व नागरिकांनी सुरक्षीत स्थळी राहून ईतर कोणतीही जिवित व वित्त हानी होणार नाही यासाठी प्रशासकिय स्तरावरुन नदिकाठच्या गावांना सुचना देण्यात यावी असे हिंगोली, यवतमाळ, पुसद, उमरखेड, कळमनुरी,हदगाव, हिमायतनगर,माहूर, किनवट या भागातील नागरिकांना दवंडीदारे सतर्कतेचा इशारा देण्यात यावा असे पत्र ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाद्वारे काढण्यात आले आहे या पत्रावर (एच.एस.धूळगंडे ) पुर नियंत्रण अधिकारी ईसापूर धरण तथा उपविभागीय अभियंता ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प व्यवस्थापन उपविभाग यांची स्वाक्षरी आहे.
या पात्राच्या प्रती मा. कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग नांदेड, जिल्हाअधिकारी यवतमाळ ,नांदेड व हिंगोली, मा.उपविभागीय अधिकारी (महसुल) उपविभागीय कार्यालय पुसद, उमरखेड, हदगांव, किनवट, कळमनुरी यांना माहितीस्तव व योग्य उपाय योजनेस्तव देण्यात आले आहे.