नांदेड| मानवी जीवनात येणाऱ्या सुख दुःखाची व्याख्या म्हणजे उन सावलीचा खेळ आहे. सुखात काही प्रश्न किंवा समस्या काही अडचणी नसतात परंतु दुःखकाळात ते निवारणासाठी माणूस प्रयत्न करतो. कोणत्याही छोट्या मोठ्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग धम्म सांगतो. सुख शांती आणि सन्मार्गाने जाण्याची दिशाही धम्म देतो असे प्रतिपादन येथील धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांचे शिष्य भिक्खू श्रद्धानंद यांनी केले. ते जवळा देशमुख येथे साजरी झालेल्या ५४ व्या काव्यपौर्णिमेत बोलत होते. यावेळी भंते सुनंद, भंते शिलभद्र, कवी थोरात बंधू, साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, माधव गोडबोले, संभाजी गवारे, श्रीरंग गच्चे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने दरमहा पौर्णिमेला काव्य पौर्णिमा हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. काव्य पौर्णिमा मालेतील ही चैत्र पौर्णिमा ५४ वी काव्यपौर्णिमा असून जवळा देशमुख येथील उपासक धम्मानंद गोडबोले, भैय्यासाहेब गोडबोले, तुकाराम गोडबोले यांच्या परिवाराकडून पौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भिक्खू श्रद्धानंद बोलताना पुढे म्हणाले की, बौद्ध धम्म सर्वांसाठी समान आहे. सर्व जाती धर्म, पंथ संप्रदाय यांमधील लोकांसाठी आहे. पंचशील, अष्टशिल, दसशील नियमितपणे पाळत असेल आणि तो कोणत्याही जाती धर्माचा असला तरी तो बौद्ध आहे. त्यासाठी शील, आचरण आणि विनय या गोष्टींची गरज असते. उपासकांनी धम्म समजून घ्यावा आणि त्यानुसार आपली वाटचाल करावी असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन केले. त्यानंतर उपासकांच्या याचनेवरुन भिक्खू संघाने त्रिसरण पंचशील दिले. त्यानंतर मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक भैय्यासहेब गोडबोले यांनी केले तर आभार नागोराव डोंगरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुमनबाई गोडबोले, सुंदरबाई गोडबोले, धमाबाई करकडे, हिरा हिरकनबाई गोडबोले, सुशिलाबाई हाटकर, वैजंताबाई गोडबोले, वच्छलाबाई गोडबोले, विशाखा गोडबोले,शांताबाई लोखंडे, सुनिता गच्चे, सुमनबाई हटकर, इंदिराबाई पंडित, करुणा गच्चे, मालताबाई गच्चे, पांडुरंग गोडबोले, पांडुरंग गच्चे, विलास गोडबोले, मिलिंद गोडबोले,कैलास गोडबोले, शंकर गच्चे, उत्तम गोडबोले, गौतम संभाजी गोडबोले,किसन गोडबोले, किशन गच्चे, बालाजी गोडबोले, मिलिंद पांडुरंग गोडबोले, भगवान गोडबोले, प्रकाश गोडबोले, उत्तम गोडबोले, सम्राट,विराट गोडबोले यांनी परिश्रम घेतले.