नांदेड| कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शासकीय औद्योगिक कामगार संघटनेच्यावतीने दि.18 एप्रिल पासून चिखलवाडी येथील उपवन संरक्षक कार्यालयासमोर बेमुद्दत धरणे आंदोलन सुरु केले आहे.
कामगारांना कायम करण्यासाठी शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावाची प्रत देण्यात यावी, कामगारांना ज्येष्ठता यादी प्रमाणे कामावर घ्यावे, कामगारांना किमान वेतनानुसार दरमहा दहा तारखेच्या आत पगारी कराव्यात, वनविभागाने कामावरुन कमी केलेल्या कामगारांना तात्काळ कामावर घेण्यात यावे तसेच मुखेड, हदगाव, देगलूर, अप्पाराव पेठ इस्लापूर रेंज मधील कामगारांना थकीत पगार तात्काळ देण्यात यावा या मागण्यांसाठी शासकीय औद्योगीक कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉ.प्रदीप नागापूरकर यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी सोमवार दि.18 एप्रिल पासून उपवन संरक्षक कार्यालयासमोर बेमुद्दत धरणे आंदोलन सुरु केले आहे.
या आंदोलनात संघटनेचे उपाध्यक्ष कॉ. अब्दुल गफार, कॉ. शिवाजी फुलवळे, कॉ.शिवाजी लाठकर, कॉ.भुजंग बेदरे, कॉ.बळीराम यादव, कॉ.मारोती काळे, कॉ.सखाराम बेदरे, कॉ.उद्धव राठोड, कॉ.मोहनाजी भिसे, कॉ.मुरली हाळदे, देविदास राठोड, यशवंत पिल्लेवाड, बाबुराव गव्हाणे, गोविंद महागीरवाड, यशवंत जाधव, गणपत राठोड यांच्यासह कामगार सहभागी झाले आहेत.