माफी नको,फक्त राजीनामाच! - गजानन जोशी -NNL


नांदेड।
गत १ आठवड्यापासून या राज्यात पौरोहित्य या विषयावर काही जातीयवाद पेरणारे लोकप्रतिनिधी यांनी कहर माजविला आहे. परन्तु याबाबत राष्ट्रवादीचे कोणतेही बडे नेते चकार शब्द काढून बोलले नाहीत,असे का? आपल्या पक्षातील लोकप्रतिनिधी/पदाधिकारी यांना आवर घालणे हे त्या पक्षाच्या अध्यक्षांचे कर्तव्य असते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आदरणीय शरद पवार यांनी याविषयी आपली व पक्षाची भूमिका स्पष्ट करावयास हवी हे निश्चित! याबरोबरच राष्ट्रवादी पक्षाने या जातीयवाद पेरणार्या लोकप्रतिनिधीवर पक्षाच्यावतीने योग्य कार्यवाही करण्यात यावी. 

तसेच राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान उद्धव ठाकरे साहेब या राज्याच्या विधिमंडळात राजकीय जातीवाद पेरणारे लोकप्रतिनिधी नको आहेत,याचा सत्ता/विपक्ष सर्वच पक्षांना त्रास होईल,त्यामुळे या जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या लोकप्रतिनिधी अमोल मिटकरी यांचा तात्काळ राजीनामाच घ्यावा,सद्यस्थितीत असे निर्णय झाले तर भविष्यात कोणत्याही जातीविषयी लोकप्रतिनिधी यांची जाहीर वक्तव्य करण्याची हिंमत होणार नाही. सकल ब्राह्मण समाजाची एकच मागणी असेल,आता माफी नको,फक्त राजीनामाच! असे मत ब्राह्मण समाजाच्यावतीने महाराष्ट्र प्रदेश युवा नेते गजानन जोशी यांनी व्यक्त केले...

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी