बारावी परीक्षा काॅपीमुक्त वातावरणात घ्यावी - तहसीलदार व्य॔कटेश मुंडे -NNL


लोहा|
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षा ४ मार्च पासून  सुरू होत आहे यंदा होम सेंटर आहे. त्यामुळे या परीक्षा काॅपीमुक्त वातावरणात शांततेत, सुरळीतप वातावरणात पार पाडाव्यात. असे आवाहन तालुका दक्षता समितीचे प्रमुख तथा तहसीलदार व्यकटेश मुंडे यांनी केले आहे.

 तहसील कार्यलयात तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय दक्षता समिती तसेच परीक्षा केंद्र उपकेंद्र संचालक यांची बैठक पार पडली.या बैठकीस गट विकास अधिकारी शैलेश वाव्हूळे , तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस निरीक्षक, संतोष तांबे लोहा  मुख्याधिकारी श्री गंगाधर पेंटे, गट शिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के, नायब तहसीलदार अशोक मोकले, शिक्षण विस्तार अधिकारी श्री बी पी गुट्टे, श्रीमती आंबलवाड, सर्व परीक्षा केंद्र संचालक, उपकेंद्र संचालक, रनर यांची उपस्थिती होती.

तहसीलदार मुंडे यांनी बारावीच्या परीक्षा कॉपी मुक्त वातावरणात पार पाडाव्यात तसेच इतर महत्वाच्या दिल्या. प्रास्ताविकात गट शिक्षणाधिकारी तथा परिरक्षक रविंद्र सोनटक्के यांनी परीक्षेच्या पूर्वतयारी बाबत सभागृहाला संबोधित केले. जिल्हास्तरीय दक्षता समिती बैठकीत जिल्हाधिकारी. डाॅ. विपीन इटनकर, शिक्षणाधिकारी. प्रशांत दिग्रसकर यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे सांगितले.

परीक्षा गैरप्रकाराविना, शांततेत पार पाडणेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या परीक्षेच्या अनुषंगाने अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. बैठे पथक, भरारी पथकाचे नियोजन करण्यात आले आहे  तसेच सर्व परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी