मराठीतच कामकाज झाले पाहिजे-प्रा.मोहसीन खान-NNL

बिलोली/नांदेड। आजच्या आधुनिक काळात व सतत वाढणाऱ्या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांसह सर्वांनाच जशी ईंग्रजी भाषा लिहता,वाचता,बोलता येणे आवश्यक आहे. तश्याच पध्दतीने आपण महाराष्ट्रातील सर्व नागरिक व मराठी भाषेवर प्रेम करणा-यांनी मराठी भाषेसाठी,मराठी शाळेसाठी त्याच्या संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे.आज सर्वच शासकिय कार्यालयात मराठी भाषेमध्येच कामकाज झाले पाहिजे असे मत अल ईम्रान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.मोहसीन खान यांनी व्यक्त केले.

मराठी राजभाषा गौरव दिन व कवी,लेखक,साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त दि.२७ फेब्रुवारी२०२२ रविवारी बिलोली आगाराच्या वतीने कोरोना नियमांचे पालन करित छोटेखानी मराठी गौरव दिन साजरा करण्यात आला.सुरुवातीला वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ वार्ताहर ए.जी.कुरेशी व वार्ताहर सय्यद रियाज या दोघांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी आगारप्रमुख च.रा,समर्थवाड,वाहतुक निरिक्षक ओ.शि.ईंगोले,प्रमुख कारागिर सं.ल.भंडारे,लिपिक एम.टी. फारुखी,रा.अ.कदम,व्हि.आर.कोलंबरे,आर.एस.चिलकेवार,वा,नियंञक एस.एन.बैस,व्हि.एन.अनमोड,कारागिर मि.ता.बेग,द.को.बोळसेकर,स.वि.सुरनरे,चालक गायकवाड कामाजी भुंजग आगारातील आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी