उस्माननगर, माणिक भिसे। विविध क्षेत्रात उल्लेखनीय, उत्कृष्ट कतृत्वावन, कृतीशील कार्य करणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील महीलाना पुरस्कार दिला जातो.यामध्ये सौ.अश्विनीताई रायफळे व सौ.कविता मुदखेडे यांच्या सह अनेक महीलाना यंदाचा जिजाऊ सावित्रीबाईरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
जिजाऊ सावित्री जयंती महोत्सवाचे औचित्य साधून आझाद ग्रुप व दै.युवाराज्या ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने कर्तृत्ववान, कृतीशील,शिक्षिका ,सांस्कृतिक ,क्रीडा ,अशा वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माता-भगिनींना जिजाऊ सावित्रीरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
नांदेड येथे दि.20 फेब्रुवारी रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर जयश्रीताई पावडे होत्या . तर प्रमुख अतिथी म्हणून नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर,नांदेड जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ.रेखाताई काळम (कदम), पी आय मा.काकडे साहेब ,ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी,ज्येष्ठ साहित्यिक डाॕ.हंसराज वैद्य
आझाद ग्रुपचे अध्यक्ष तथा युवा उद्योजक मा.भीमाशंकर कापसे मामा,दै.युवाराज्य अध्यक्ष प्रा.शिंदे सर ,जिया ग्रुपच्या अध्यक्षा सौ.ज्योतिताई कापसे,संतोष भाऊ मुरकुटे,प्रमोद टाले साहेब ,शिवाजी राजे पाटील ,प्रा.धाराशिव शिराळे,पांडुरंग भाऊ शेट्टे,प्रा.गवते सर,दिपक रायफळे,रुद्रा पाटील ,शिवहार पाटील पांडागळे,गोविंद हाबगुंडे,नागेश लोंढे,प्रसाद पोले,तुषार बोंढारे, ऋषीकेश अंधळे,पञकार साईनाथ केते सर आदी उपस्थित होते.