जवळगावात सुरु असलेल्या वृक्षलागवडीच्या प्रत्येक ग्रामपंचायतीने आदर्श घ्यावा - डॉ.विपीन -NNL

गावकऱ्यांच्या पुढाकाराने झाडे लावण्याचा संकल्प यशस्वी होतोय


हिमायतनगर, अनिल नाईक| नांदेड जिल्हा प्रशासनाचा जिल्ह्यात ५० लक्षांहून अधिक झाडे लावण्याचा संकल्प असून, त्यासाठी तालुका व ग्रामीण गावांची मदत घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आ.जवळगावकर यांच्या मूळ गावात म्हणजे हदगाव - हिमायतनगर मतदार संघातून जवळगाव ग्रामपंचायतीने वृक्ष लागवडीची सुरुवात करून आत्तापर्यंत ५ हजाराहून अधिक वृक्ष येथील गायरान जमीन, स्मशान भूमी, रस्ताही प्रत्येक घर्घरासमोर लावली आहेत. आम्हाला वृक्ष लागवडीसाठी कुठलही टार्गेट नाही, ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये, गायरान आणि स्मशान भूमी अश्या ठिकाणी झाडे लावण्याचा संकल्प केला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपिन यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलतांना दिली आहे.     

संपूर्ण गावाने झाडे लावण्याचा एक चांगला उपक्रम ग्रामपंचायतीने आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली घेतला असून, जवळपास ५ हजार लोकसंख्या असलेल्या गावातील प्रत्येक कुटुंबाने एक कल्पवृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतली आहे. या गावास जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी भेट देऊन वृक्ष लागवडीची पाहणी करून कल्पवृक्षसह लावून शुभारंभ केला. तसेच गावकऱ्यांच्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केला आहे. तसेच गावातील प्रत्येक नागरिकांनी कल्पवृक्ष भेट देऊन भविष्यात हे गाव हरित होऊन जिल्ह्यातील प्रत्येक गावासाठी एक आदर्श ठरेल असा विश्वास  त्यांच्यासह जवळगावकरांना आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार, एसडिओ जीवराज डापकर, महेश वडदकर, तहसीलदार गायकवाड बीडीओ मांजरमकर, वनपरिक्षेत्र अधिकारी संध्याताई डोके, अभियंता भोजराज, परमेश्वर गोपतवाड, कैलास माने, सुभाष राठोड, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष बालाजी पोगुलवाड आदींसह अनेकांची उपस्थिती होती.


हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या जवळगावात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यापासून दुतर्फा झाडे लावण्यात आली आहे, तसेच मुख्य रस्त्याला जागृत जगदंबा देवीचं मंदिर असल्याने जवळगाव एका आदर्श गाव ठरल आहे. या गावामध्ये आनंदवन-घनवन मियावाकी पद्धतीने गावात तब्बल 3 हजाराहून अधिक झाडे लावण्यात आली आहेत. गावातील गायरान जमीन, मोकळी, पडीक जागा, स्मशान भूमीसह मिळेल त्या जागेवर झाडे लावण्यात आली आहेत. यंदा कोरोना महामारीमुळे जगभरातील नागरिकांना ऑक्सिजनचे महत्व जाणवू लागले असून, वन परिक्षेत्र कमी होत असल्याने आता गावांची मदत घेऊन प्रशासन झाडे लावण्याचा स्तुत्य उपक्रम राबवत आहे.  

कल्पवृक्षांच्या झाडांची लागवड

वृक्षारोपणाच्या या चळवळीत ग्रामस्थाचा सहभाग वाढावा यासाठी आमदार माधवराव पाटील कल्पवृक्षांच्या झाडाची निवड केलीय. कल्पवृक्ष अर्थात नारळाच्या झाडांची निवड वृक्षारोपणासाठी केलीय. ही झाडे लावल्यानंतर त्याचे संगोपन करणाऱ्याला त्यातून येणाऱ्या नारळाच्या माध्यमातून उत्पन्न होईल, अशी या मागची भावना आहे. त्याकरिता जवळगाव इथल्या सर्व कुटुंब प्रमुखांना बोलावून त्यांना कल्पवृक्षांचे रोपटं भेट म्हणून देण्यात आलय. ग्रामस्थांनी आपल्या दारात हे झाड लावून त्याचे संगोपन करायचे आहे.

स्मशानभूमीला दिल बगीचाच रूप 

जवळगाव येथील ग्रामस्थांनी गावातील हिंदू - मुस्लिम स्मशानभूमीत मियावाकी पद्धतीने तीन हजार रोपट लावली आहेत. यात विविध प्रकारच्या फळांची झाडे देखील लावण्यात आली असून, या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी जवळगाव ग्रामपंचायतीने घेतली आहे. झाडांची नीट आणि जलदगतीने वाढ व्हावी यासाठी आवश्यक ती खते आणि पाणीपुरवठा ग्रामपंचायत करणार आहे. झाडे जंगली पाहिजे यासाठी तरी गार्ड लावण्यात आले असून, जवळगावच्या दोन्ही धर्माच्या स्मशानभूमी आता बगीचा सारख्या दिसत आहे.

प्रत्येक नागरिकांच्या पुढाकारातून वृक्षलागवडीची चळवळ सुरु - आ.जवळगावकर   


हदगाव-हिमायतनगरचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे मुळगाव असल्याने जवळगावची ओळख जिल्हाभरात आहे. संपूर्ण नांदेड जिल्ह्यात या अनोख्या वृक्ष लागवडीच्या उपक्रमामुळे जवळगाव प्रसिद्धच्या झोतात आले आहे. याच गावाने आता वृक्षारोपणाची चळवळ वृद्धिंगत व्हावी यासाठी पुढाकार घेतला असून, गावातील प्रत्येक नागरिकांच्या पुढाकारातून हि चळवळ उदयास आली असल्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी सांगितले आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी