वृक्षारोपणाची धूम

उज्वल भविष्यासाठी वृक्ष व जलसंवर्धन करा - 
आ.नागेश पाटील आष्टीकर 

हिमायतनगर (अनिल मादसवार) महाराष्ट्र शासनाने दोन कोटी वृक्ष लागवडीच्या संदेशाला हिमायतनगर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, दि. 01 जुलै रोजी हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भविष्यातील दुष्काळ व हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी किमान एक वृक्ष लावून त्याचे संवर्धन करावे तरच भविष्यकाळ उज्वल होईल असे प्रतिपादन हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी केले.


ते हिमायतनगर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण, पंचायत समितीच्या सभागृहास वसंतराव नाईक यांचे नामकरण कार्यक्रमाप्रसांगीं बोलत होते. यावेळी मंचावर हिमायतनगर प.स.सभापती आडेलाबाईं हातमोडे, हदगाव प.स.सभापती बाळासाहेब कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम, उपविभागीय अधिकारी आविशकुमार सोनोने, तहसीलदार गजानन शिंदे, उपसभापती पंडित रावते, वामनराव वानखेडे, बालाजी राठोड, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, शासनाने जलसिंचनचा उद्देश लक्षात घेऊन जलयुक्त शिवार हा उपक्रम हाती घेतला आहे, मोठ्या प्रमाणात ही कामे झाली असून, जिकडे तिकडे पाणी साठवलेले दिसून येत आहे. यामुळे शेतीच्या सिंचनाचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटला आहे, काही ठिकाणच्या शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाले असले तरी जलयुक्तमुळे जमीनीत पाणी मोठ्या प्रमाणात मुरले आहे, त्यामुळे आगामी काळात पाण्याची टंचाई भासणार नाही हे तेवढेच खरे आहे. काही ठिकाणची कामे राहिली असून, आगामी काळात ते पूर्ण करून संपूर्ण मतदार संघातील जलस्रोत वाढवून सिंचनाची कायम संशय सोडविण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करणार आहे. वरून राजाची कृपा दृष्टी व्हावी आणि उष्णतेचे प्रमाण कमी व्हावे यासाठी वृक्ष लागवड करणे अत्यंत निकडीचे आहे. शासनाच्या दोन कोटी वृक्ष लागवीडीचे उद्दिष्ठ पूर्ण करण्यासाठी सर्वानी यात सहभागी होणे गरजेचे आहे. यासाठी शासनाच्या वतीने ट्री - गार्ड व वृक्ष संवर्धनासाठी एक कर्मचारी नेमण्यात येणार आहे. पर्जन्यमान व ऑक्सिजन वाढण्यासाठी आणि तापमान नियंत्रित ठेवणे आपल्या हातात आहे. शेतकऱ्यांसह सर्वानी वृक्ष लागवड व संवर्धन करून हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना आदरांजली अर्पण करावी असे आवाहनही त्यांनी केले. त्यानंतर पंचायत समिती व तहसील कार्यालय परिसरात तहसीलदार गजानन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम पांडे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार गायकवाड, देवराई, गटविकास अधिकारी विलास गंगावणे, विस्तार अधिकारी रविराज क्षीरसागर, राम राठोड, सत्यव्रत ढोले, मदनराव पाटील, बंडू पाटील आष्टीकर, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, संजय काईतवाड, विठ्ठल ठाकरे, संदीप पळशीकर, बाळू चवरे, साईनाथ धोबे, मंडळ कृषी अधिकारी जाधव, कृषी अधिकारी एम.पी.सुळे, पुंडलिक माने यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी अनेक शेतकरी, नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. 
  
महावितरणसह सर्वच ठिकाणी वृक्षारोपणाची धूम


तसेच महावितरण कार्यालयात आ.नागेश पाटील आष्टीकर, उपकार्यकारी अभियंता भोंगाडे, सहाय्यक अभियंता पंडित राठोड, बाबुराव कदम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामीण रुग्नालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसमतकर, डॉ. डी.डी. गायकवाड व कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण केले. पशुवैद्यकीय कार्यालतात पशुधन विकास अधिकारी धनंजय मांडले, भाजपचे तालुकाध्यक्ष गजानन तुप्तेवार, भाजपचे सरचिटणीस डॉ.प्रसाद डोंगरगावकर, अनिल भोरे, कांतागुरु वाळके, बालाजी ढोणे यांच्या हस्ते वृक्षारोपण केले. नगरपंचायत कार्यालायत नगराध्यक्ष अ.अखिल अ.हमीद, उपनगराध्यक्ष सौ सविता अनिल पाटील, प्रभारी मुख्याधिकारी गजानन शिंदे, शे.मेहबूब शे.बंदगी साब, मारोती हेंद्रे, बाळू हरडपकर, विठ्ठल शिंदे, शासकीय अन्नधान्य गोदाम येथे  गोदामपाल गौतम राऊत, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष दशरथ गोसलवाड, पातुरकर संघाचे अध्यक्ष पांडुरंग गाडगे, अनंता देवकते, नंदू आप्पा पळशीकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय टेभी येथे सरपंच रवींद्र कदम, उपसरपंच बुद्धेवाड, ग्रामसेवक राहुलवाड यांनी तर जिरोणा येतेच ग्रामपंचायत कार्यालयावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सरपंच नागन राठोड, उपसरपंच सुरेश वानखेडे, पोलीस पाटील ज्योती गंगाधर मिराशे, ग्रामसेवक नितेश ताटीकुंडलवाड, तलाठी माने व पत्रकार कानबा पोपलवार यांच्या हस्ते तर उत्कर्ष फोटो गैलरी येथे आकांक्षा मादसवार, अनिल मादसवार, उत्कर्ष मादसवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. आयटी आय कार्यालयात प्राचार्य बिराजदार व सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका कृषी कार्यालय, दुय्यम निबंधक, सहाय्यक निबंधक, वनपरिसक्षेत्र अधिकारी कार्यालयासह सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात वरक्षारोपण करण्यात आले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी