समाज परिवर्तनाची आजच्या साहित्यिकांवर मोठी जबाबदारी -NNL

संमेलनाध्यक्ष अनिल मोरे यांचे प्रतिपादन, फुले आंबेडकरी विचारधारा साहित्य संमेलन उत्साहात 


नांदेड|
साहित्य संमेलनातून सकस आणि दर्जेदार विचारमंथन झाले पाहिजे. ज्वलंत अशा मूल्याधिष्ठीत राजकीय-सामाजिक प्रश्नांवर फुले- आंबेडकरी साहित्य संमेलनातून चर्चा अपेक्षित आहे. पण अशी काही चर्चा कोणत्याही आंबेडकरी बौद्ध वा विद्रोही साहित्य संमेलनातून होताना दिसत नाही. फुले आंबेडकरी साहित्यिकांना कृतीशील विचारांचाच विसर पडला आहे, असे दिसते. त्यामुळे आजच्या संक्रमण काळात समाज परिवर्तनाची साहित्यिकांवर फार मोठी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन फुले आंबेडकरी विचारधारा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कलावंत विचारवंत तथा माजी सनदी अधिकारी अनिल मोरे यांनी केले. ते पाचव्या फुले आंबेडकरी विचारधारा साहित्य संमेलनात बोलत होते. 

यावेळी मंचावर उद्घाटक भदंत पंय्याबोधी थेरो, त्यांचा भिक्खू संघ  राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य विलास सिंदगीकर, प्रमुख अतिथी साहित्यिक डॉ. राम वाघमारे, स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. सा. द. सोनसळे', विवेक काटीकर, यशवंत मनोहर प्रतिष्ठान नागपूरचे अध्यक्ष प्रशांत वंजारे, निमंत्रक तुकाराम टोंपे, काव्य पौर्णिमा अध्यक्ष दिगंबर कानोले,  मुख्य संयोजक अशोक मल्हारे, सहसंयोजक प्रभू ढवळे, संयोजन समितीचे अध्यक्ष मारोती कदम, उपाध्यक्ष डॉ. गजानन देवकर, कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे यांची उपस्थिती होती.

राज्य साहित्य संस्कृती मंडळ‌ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित पाचव्या फुले आंबेडकरी विचारधारा साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. शहरातील आयटीआय चौकस्थित  म. फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान रॅलीस प्रारंभ झाला.  यात माजी उपप्राचार्य साहेबराव इंगोले प्रा एस.एच. हिंगोले, प्रा. विनायक लोणे यांच्या संयोजनाखाली श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा येथील भिक्खू संघाने सहभाग नोंदवला होता. रॅलीचे विसर्जन प्रतापसिंह बोदडे साहित्य नगरी कुसुम सभागृह येथे करण्यात आले. त्यानंतर कवी दिगंबर कानोले यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटनपूर्व ६१ वी काव्य पौर्णिमा संपन्न झाली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला म. फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्पपूजन आणि दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर  'संघनायक' आणि 'दैनिक प्रबुद्ध परिवार' या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. सुप्रसिद्ध कवी विवेक काटीकर यांना दहा हजार रुपयांचा धनादेश, मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन कवीसूर्य यशवंत मनोहर काव्य पुरस्काराने गौरविण्यात आले. सन २०२१ आणि सन २०२२ या वर्षांचे फुले आंबेडकरी विचारधारा राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले. तसेच मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठानच्या पुरस्कारांचेही वितरण झाले. दरम्यान, तुकाराम टोंपे,  प्रा. डॉ. सा. द. सोनसळे, विलास सिंदगीकर, डॉ. राम वाघमारे यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक मारोती कदम यांनी केले, सूत्रसंचालन प्रज्ञाधर ढवळे यांनी केले तर आभार आनंद गोडबोले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनुरत्न वाघमारे, नागोराव डोंगरे, रणजीत गोणारकर, साईनाथ रहाटकर, कैलास धुतराज, शंकर गच्चे, प्रकाश ढवळे, भैय्यासाहेब गोडबोले यांच्यासह संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी