स्वातंत्र्य संग्रामाला नाट्यपदातून उजाळा' दिव्य स्वातंत्र्य रवि' ने उलगडला रोमांचक प्रवास -NNL

‘भारतीय विद्या भवन’,‘इन्फोसिस फाऊंडेशन’चा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम  

पुणे| भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ' दिव्य स्वातंत्र्य रवि'  कार्यक्रमातून स्वातंत्र्यलढयाचा रोमांचक प्रवास उलगडला आणि नाट्य पदातून या प्रवासाला मिळालेला उजाळा पाहून रसिक भारावून गेले !

कार्यक्रमाची सुरुवात 'धीर वीर पुरुष पदा नमन असो ' या नांदी ने झाली.  यानंतर मानापमान या नाटकातील वीर रसा तील  पद 'माता दिसली ',  वीर वामनराव जोशी  यांच संगीत रणदुदंभि या नाटकातील संवाद आणि  'आपदा राजपदा 'हे पद सादर करण्यात आले. गोविंद बल्लाळ देवल यांच्या संगीत शारदा मधील 'जो लोककल्याण साधावया जाण ' हे लोकमान्य टिळकांवरील पद सादर झाले.संगीत पट-वर्धन या नाटकातील 'तारिणी नववसन धारिणी '  कृष्ण द्रौपदीला या पदातून सांगतो तुझ्या देशात तयार होणारे वस्त्र परिधान कर म्हणजेच स्वदेशी वस्त्र परिधान कर असा संदेश या गीतातून देण्यात आला होता.

स्वांतत्र्य वीर सावरकर यांच्या 'सन्यंस्त खड्ग ' या नाटकातील संवाद  सादर करण्यात आला. आचार्य अत्रे यांच्या ' वंदे भारतम ' या  सामाजिक विषयावरील नाटकातील ' तोच खरा हिंदु' हे  पद्य गंधार दांडेकर यानी सादर केले. बेबंदशाही ' नाटकातील संवाद देखिल सादर करण्यात आला.

' वंदे भारतम ' याच  नाटकातील ' वाजे नभी चौघडा ' हे जोशपूर्ण पद् सादर झाले. काकासाहेब खाडीलकर यांच्या संगीत 'मानापमान ' या नाटकातील सेनापती बक्षीसाची सर्व रक्कम सैन्यात वाटतो त्या शूरांना वंदन करण्यासाठी हे पद गायल गेले आहे. ' शूरा मी वंदिले ' हे नाट्यगीत सादर झाले.  यानंतर वसंत देसाई यांच्या  नाटक ' विधिलिखीत ' मधील दिव्य देश कार्या मी सजले, हे सौख्य सोडून, हे नाट्य पद पूर्णा दांडेकर यांनी सादर केले.'शिक्का कट्यार ' हे शहाजी महाराज यांच्यावरील नाटकातील हे पद ' माता वचन दे सदा देशा,  बा महाराष्ट्रा जागा होई , ग्वाही देत माय भवानी स्वातंत्र्य साधाया देशा ' हे अप्रतिम नाटयपद सादर झाले.

पंडित दिनानाथ मंगेशकर यांनी त्या काळात निर्भिडपणे इंग्रज अधिकाऱ्यासमोर ' परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागल्या  हे गीत गायले होते. ते नाटयपद सादर करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता मधुवंती दांडेकर यांनी ' रण दुदंभि' या नाटकातील ' दिव्य स्वातंत्र्य रवी ' या पदाने केली. शनिवार, ६ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ६  वाजता  भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे  येथे हा कार्यक्रम झाला.

 भारतीय स्वातंत्र्य लढयातील संगीत रंगभूमीच्या योगदानाचे सादरीकरण या विशेष कार्यक्रमामध्ये करण्यात  आले. संगीत नाटकातील संवाद, नाटयपदे यांचा समावेश या कार्यक्रमात  होता.संकल्पना, संगीत मार्गदर्शन मधुवंती दांडेकर यांचे होते.  चिन्मय जोगळेकर, पूर्णा दांडेकर, संजय गोगटे ऑर्गन, विद्यानंद देशपांडे - तबला,  वर्षा जोगळेकर, गंधार दांडेकर आणि मधुवंती दांडेकर सहभागी झाले होते. 

भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. सर्व कलाकारांचा प्रशस्तीपत्रक आणि ज्ञानेश्वरी देऊन सत्कार करण्यात आला. संगीताचे ज्येष्ठ अभ्यासक रामभाऊ कोल्हटकर कार्यक्रमाला उपस्थित होते. हा कार्यक्रम विनामूल्य होता.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा  १३४ वा कार्यक्रम  होता. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करावा, या  पंतप्रधानांनी केलेल्या  आवाहनाला प्रतिसाद म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मधुवंती दांडेकर यांनी दिली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी