नवीन नांदेड। जिवनात संस्कार महत्त्वाचे असल्याचे सांगून आजची पिढी ही हरीपाठ ऐवजी मोबाईल मध्ये व्यस्त असल्याचे सांगून भक्ती भाव यासह ज्ञान अज्ञान व विज्ञान ,कलयुग या काळासह वर्तमान काळातील अनेक विषयांवर अंभग मधुन किर्तना व्दारे हभप शिवलिलाताई पाटील यांनी सांगितले.
नांदेड येथील गोदावरीच्या तीरावर असलेले प्रसिध्द पुरातन असलेले मार्कंड येथील मार्कंडेश्वर मंदिर येथे श्रावण सोमवार निमित्त कीर्तनकार शिवलीलाताई पाटील सोलापूरकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते , या सोहळ्यास राघोजी हंबर्डे,युवा नेते राहुल हंबर्डे, भुजंग पाटील , माजी जिल्हा परिषद सदस्य आंंनद गुंडले, संचालिका विजयाताई शिंदे, माजी नगरसेविका सौ ,ललिता शिंदे, यांच्या सह पंचक्रोशीतील शेकडो भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
दि. २२ ऑगस्ट श्रावण सोमवार निमित्त सकाळी १०ते १२ या वेळेत कीर्तनकार शिवलीलाताई पाटील सोलापूरकर यांनी आपल्या किर्तन मधुन आई वडील यांच्यी सेवा करा,राजकारण,शिक्षण यासह भक्ती मधील अनेक प्रसंग सांगितले, भजनाचा साथ संगतीने या किर्तन सोहळ्याला संगत लाभली, यावेळी धनेगावचे संरपच गंगाधर पाटील शिंदे (पिंटू पाटील), ऊपसंरपच डॉ.पुजा शिंदे, बाभूळगावचे सरपंच पुंडलिक मस्के, मारोती धुमाळ, नंदु वैघ, उध्दव हंबर्डे, गंगाधर पाटील कवाळे, दता पाटील शिंदे,यांच्या सह परिसरातील जेष्ठ नागरिक महिला, युवक , मोठया प्रमाणात ऊपसिथीत होते,आयोजक जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत आयोजक यांच्या वतीने करण्यात आले. किर्तन सोहळ्यानंतर भाविक भक्तांसाठी महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते.या किर्तन सोहळ्याला ग्रामीण भागातील भावीक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.