हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात, विभाजन विभिषिका स्मृतिदिन साजरा -NNL


हिमायतनगर।
रविवार दिनांक 14/8/ 2022 रोजी हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने विभाजन विभिषिका स्मृतिदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम हे होत्या तर प्रमुख वक्ते म्हणून इतिहास विभाग प्रमुख डॉ.वसंतराव कदम हे होते.

महाविद्यालयातील राष्ट्रीय ध्वजारोहणा नंतर हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामातील थोर क्रांतिवीर,शुर स्वातंत्र्य सेनानी हुतात्मा जयवंतराव पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करून विभाजन विभिषिका स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख वक्त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला परंतु त्याअगोदर 14 ऑगस्ट 1947 रोजी भारत देशाची फाळणी झाली. त्यामुळे विस्थापितांचा फार मोठा प्रश्न निर्माण झाल्या मुळे देशात अराजक निर्माण झाली होती. फाळणीमुळे झालेल्या इतर अनेक दुष्परिणामावर  सविस्तर मार्गदर्शन केले .


तसेच  हुतात्म्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान यावरही प्रकाश टाकला. तदनंतर प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी "जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले" या गीताचे हुबेहूब चित्र युवकासमोर उभे करून देशासाठी बलिदान दिलेल्या, मातृभूमीसाठी आपले सर्वस्व अर्पण केलेल्या हुतात्म्यांचे योगदान,हा विषय मांडून विद्यार्थ्यांमध्ये संवेदना निर्माण केल्या.


कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा.डॉ.डी. के. मगर  अर्थशास्त्र विभाग प्रमुख तसेच प्रा.डॉ.एस एन भदरगे  राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी उपस्थित होते, सदरील कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.डी के कदम स्टाफ सेक्रेटरी तथा समाजशास्त्र विभाग प्रमुख यांनी केले तर आभार प्रा. संदिपान निखाते इतिहास विभाग यांनी मांडले यानंतर हर घर तिरंगा या कार्यक्रमांतर्गत नगरात तीरंगा रॅली काढून कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी