५५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अर्धापूर, निळकंठ मदने| तालुक्यातील मालेगाव येथे दुचाकीवरून कट मारल्याच्या कारणांवरून दोन गटात बाचाबाची झाली,याचे पर्यावसान हाणामारीत झाले, मध्यस्थी करणारे पोलीस किरकोळ जखमी झाले, याप्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात दोन्ही गटातील तब्बल ५५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,येथे परीस्थिती नियंत्रणात आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी लक्ष ठेवून आहेत.
अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे दुचाकीवरून कट मारल्याच्या शुल्लक कारणावरून गुरुवारी दोन गटात बाचाबाची झाली. शुक्रवारी सकाळी पुन्हा काही तरुणांनी हे मिटलेले प्रकरण गरम करुन दोन गटात हाणामारी झाली. यावेळी काही दुकानावर दगडफेक केल्याने प्रवासांसह दुकानदारांना त्रास सहन करावा लागला. यावेळी घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे,पोलिस विभागीय अधिकारी अर्चना पाटील, यांनी घटनास्थळी भेट दिली. तर पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी परीस्थिती नियंत्रणात आणली.
यावेळी अफवावर विश्र्वास ठेवू नये अशी माहिती पोलिसांनी दिली, यावेळी जमादार पप्पू चव्हाण, संदीप आनेबोईनवाड,भिमराव राठोड, रामचंद्र जोशीहे पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी पोउनि बळीराम राठोड यांच्या फिर्यादीवरून दोन्ही गटातील तब्बल ५५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मालेगावात आर सी टी चे जवान तैनात असून, परीस्थिती नियंत्रणात आहे.