शिवराज्याभिषेक म्हणजे कल्याणकारी राज्याची संकल्पना-ऍड.प्रदीप नागापूरकर -NNL


नांदेड|
शिवराज्याभिषेक आतूनच कल्याणकारी राज्याची संकल्पना अस्तित्वात आली असे मत सायन्स कॉलेज शालेय समिती अध्यक्ष ऍड.प्रदीप नागापूरकर यांनी व्यक्त केली.

नांदेड एज्युकेशन सोसायटी संचालित सायन्स महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना ऍड. प्रदीप नागापूरकर म्हणाले शिवाजी महाराजांचा कार्यकाळ हा जुलमी राजे राजवाडे यांच्या वसाहतवादी राजवटीचा विस्तार करण्याचा होता. शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याचा विस्तार केवळ सरकारी खजिना भरण्यासाठी केला नाही. राज्यातील जनतेचं कल्याण व्हावं त्यांचा विकास व्हावा यासाठी शिवाजी महाराजांनी जातीधर्मातील सर्वसामान्य माणसाला जोडून आपले राज्य स्थापन केले.व शिवराज्याभिषेक करून घेतला त्यातूनच कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेचा जन्म झाला असे मत नागपूरकर यांनी यावेळी व्यक्त केले. 

प्राचार्य दिलीप गवई सर त्यावेळीं जे राजे होते त्या राज्यापेक्षा निश्चितच वेगळे होते, ते खरे खुरे जनतेनेचे राज्य होते. त्यांनी कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडली ती आपल्या भारतीय राज्यघटनेतेत अमलबजावणी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे.या कार्यक्रमाचे वेळी डॉ सुधाकर इंगळे, डॉ. एस. एल. जाधव, उप प्राचार्य डॉ.लक्ष्मण शिंदे यानी मनोगत व्यक्त केले आहे. सूत्रसंचालन डॉ अरुणा शुक्ला यांनी केले. तर आभार उपप्राचार्य डॉ. डि. डि. पवार यांनी मानले. यावेळीं उपप्राचार्य एकनाथराव खिल्लारे, डॉ. बी. डी. गंचाडे ,सौ. चौधरी पी. आर. व इतर कर्मचारी उपस्थितीत होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी