नांदेड। संध्या खरिप हंगाम तोडावर काही कृषि व्यापारी हदगाव तालुक्यात युक्रेन व रशिया युद्धाचे कारण सागुन बि-बियाणे खताचे वाढीव दराने विकत असल्याचे निवेदन प्रल्हाद पाटील हडसनीकर तंटामुक्ती अध्यक्ष यांनी तहसिलदार हदगाव यांना दिले आहे.
त्यानी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खरीप हंगामला काही दिवसातच खरीप हंगामला सुरुवात होणार आहे. हदगाव तालुक्यात ना पिकी दुष्काळ मुळे शेतकरी मेटाकुटीला आलेल आहे शेतकरी बी-बियाणे घेण्यासाठी तळमळ करित आहे याचाच फायदा काही कृषि व्यापा-यानी बियाणे व खताचे भाव दुप्पट वाढवून ठेवलेले आहे.
भाव वाढविण्याचे कारण युक्रेन व रशिया युद्धाचे कारण देण्यात येत असल्याचे ही दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आलेले आहे. यामुळे शेतकरी ञस्त व हैराण हे या बाबतीत शेतकरी द्विवध अवस्थेत दिसुन येत असुन शेतकऱ्यांना खते बि-बियाणेचे भाव मी करुन शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दयावे अशी मागणी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत. या निवेदनावर रवी गोरे .संरपच (बेलगव्हाण .) नाथा हेद्रे सिताराम महाजन विलास महाजन आदीच्या सह्या आहेत.