महिला दिन संदेश आत्मसन्मान जपा, आत्मनिर्भर व्हा-NNL

डॉ. विनीता आपटे ( संस्थापक, तेर पॉलिसी सेंटर )


पुणे।
प्रत्येक देशाला दोन पंख असतात ,एक स्त्री आणि एक पुरुष. साहजिकच देशाची उन्नती व्हायची असेल तर दोन्ही पंखांचा सन्मान होणं गरजेचं आहे. 

महिला आघाडीवर नाहीत असं आज एकही क्षेत्र नाही. अशा महिलानी इतरही महिलाना सक्षम बनवणं ही खरी गरज आहे. सार्वजनिक क्षेत्रात काम करणा-या यशस्वी महिलाना पुरुषी अहंकाराचा सामना करावाच लागतो .त्या शिवाय महिला सह्कारीपण अनेकदा दुस्वास करतात व त्यामूळे महिलांना दोन्ही आघाड्यांवर शत्रु निर्माण होतात. 

सकारात्मक वृत्ती, खंबीरपणे निर्णय घेण्याची क्षमता या गोष्टी महिलांनी आत्मसात कराव्यात. कुठ्ल्याही प्रलोभनांना बळी न पडता आपला स्वत:चा आत्मसन्मान जपावा व आत्मनिर्भर व्हावे असे मला नेहमीच वाटते.

मी पर्यावरण क्षेत्रात काम करणा-या अनेक महिला बघत असते . आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असणा-या महिला खुप जास्त आहेत. जंगल खात्यासारख्या पुरुषप्रधान क्षेत्रात महिला आपला वेगळा ठसा उमटवत आहेत याचा विशेष अभिमान वाटतो. पृथ्वी वरचं पर्यावरण वाचवायचं असेल तर महिलांचे योगदान मह्त्वाचे आहे. पाण्याची बचत, विजेची बचत व स्वच्छता यासारख्या गोष्टी महिलाच प्रभावी पद्धतीने करु शकतात.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी