शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान; तपास करून न्याय देण्याची मागणी
हिमायतनगर| तालुक्यातील मौजे एकंबा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या शेतातली ३ एकरातील हातभार कुणत्यातरी अज्ञात व्यक्तीने गटारीला फुकून दिला आहे. या घटनेमुळे गरीब शेतकरी अडचणीत आला असून, यात त्यांचे १ लक्ष ३० हजारांचे नुकसान झाले आहे. या प्रकारचा तपास करून न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
हिमायतनगर तालुक्यात यंदा खरीप हंगाम अतिवृष्टीने गेला, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रब्बीच्या हंगामात आपले झालेले नुकसान भरून काढण्यासाठी जीवापाड मेहनत घेत आहेत. अशीच मेहनत घेऊन एकंबा येथील शेतकरी शामराव कानोबा सोनकांबळे यांनी शेत सर्वे नंबर ३३२ मधील ३ एकरात हरभरा (चन्याच) पीक घेतलं होता. अल्पभूधारक आणि गरीब परिस्थिती असल्याने शेतकऱ्याने शेतीतील हरभऱ्याची घरीच कंपनी केली होती. मात्र त्यांच्या या पिकाला कुणाचीतरी वक्रदृष्टी लागली आणि दि.१४ मार्चच्या रात्रीला गावात कानिफनाथ यात्रेतील काठीचा कार्यक्रम सुरु असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गावाजवळून १ किमी अंतरावर पैनगंगा नदीकाठी असलेल्या शामराव यांच्या शेतातील हरभऱ्याच्या ढगाला आग लावली.
या आगीच्या भक्षस्थानी ३ एकरातील हरभऱ्याचे ढिगार सापडून अंदाजे ३० कुंटल हरभरा जळून खाक झाला आहे. यामुळे शेतकऱ्याचे १ लक्ष ३० हजारांचे नुकसान झाले असून, कुणीतरी अज्ञात व्यक्तीने द्वेष भावनेतून आग लागून नुकसान केले असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला असून, असे कृत्य करणाऱ्याच्या विरोधात कार्यवाही व्हावी आणि मला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. या अगोदर महिन्यापूर्वी याच शेतकऱ्याच्या शेतातातील स्प्रिंकलर संच फोडून कुणीतरी नुकसान केले होते. पुन्हा हरभरा जाळून टाकला यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई मिळावी अशी अपेक्षाही गावकर्यांनी व्यक्त केली आहे.