उमरी| नांदेड नव्हे तर महाराष्ट्रात उद्योग क्षैञात उल्लेखनीय कार्य केलेले उद्योजक मारोतराव कवळे गुरूजी यांचा गौरव म्हणजे ख-या अर्थाने तरुण पिढीला प्रेरणादायी ठरेल.असे गौरोदगार महसुल मंञी ना.बाळासाहेब थोरात यांनी केले.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद पुणे च्या वतीने भारतरत्न जे.आर.डी टाटा उद्योग पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते संगमेश्वर जि.अहमदनगर येथे बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योजक गिरिष मालपाणी, आ.सुधीर तांबे, सुशीलकुमार राणे,यांचा व्यासपीठावर उपस्थित होती. यावेळी व्हिपीके व एमव्हिके उद्योग समुहाचे चेअरमन मारोतराव कवळे गुरूजी यांना भारतरत्न जे.आर.डी.टाटा उद्योग रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुढे बोलतांना बाळासाहेब थोरात म्हणाले उद्योग रत्न हे उद्योग उभारण्यासाठी आहोराञ मेहनत घेऊन अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणे. ते उद्योग क्षैञाचे काम कार्य म्हणजे भारत देशाला प्रगतीकडे घेऊन जाण्याचे काम एक राष्ट्र सेवा आहे. तसे कवळे गुरूजी भागात साखर कारखाने, गळ कारखाने, बॅका, दुग्धव्यवसाय आधी उद्योग वाढुन अनेकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन दिले. त्यामुळे कवळे गुरूजी मोठे योगदान आहे. ऊस पिकांना मोठ्या प्रमाणात भाव देऊन शेतकऱ्यांची आर्थिक बाजु भक्कम करण्याचे कवळे गुरूजीचे आहे. असे ना मंञी बाळासाहेब थोरात बोलतांना म्हणालेत. या सुंदर कामात कार्यध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी उद्योजक मारोतराव कवळे गुरूजी यांनी मुलाखत घेतली.त्यास समर्पक उत्तरे दिली. यावेळी या कार्यक्रमात उद्योग क्षैञात उल्लेखनीय कार्य केले असे सचीन ईटकर, सुदाम भोरे, राजेंद्र वाघ, मारोतराव कवळे, गणेश भांड, नानासाहेब वर्पे, सतिश अभाळे, अक्षरा राऊत, हेमंत नेमाडे याना सन्मानित करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुञसंचलन दिगंबर ढोकले यांनी केले.यासोहळ्यास आदरणीय जेष्ठ संचालक प्रभाकर पाटील पुयेड, गणेशराव पाटील ढोलउमरीकर, साहित्यिक दिगंबर कदम, मोहनराव पाटील कार्लेकर, लक्ष्मणराव पाटील हरेगावकर,प्रल्हाद पाटील हिवराळे, माधवराव पाटील ढगे, परमेश्वर पाटिल कवळे, मुस्सा सेठ, आत्माराम चव्हाण, अनिल वडजे, मारोती उमाटे, धनराज पाटील, तानाजी पाटील,पंजाब पाटिल, गोविंद ढगे, आनंदराव पाटील, मधुकर बोळेकर, मारोती नरवाडे, शिंधीचे पुढील सरपंच आनंदराव पाटील पुयेड श्रीनिवास ढगे, रामचंद्र कवळे,कैलास कवळे, कळमकर, सोनकाबंळे,गुमलवाड, मोठ्या संख्येने कार्यक्रत्य उपस्थित होते. शेवठी सदर कार्यक्रम पसायदानाने झाले.