बेश्रमामुळे पुराच्या धोक्याची शक्यता

नाला खोलीकरण व सरळीकरणासाठी १५ लाख
मंजूर होऊनही काम रखडले....
ओढ्यातील बेश्रमामुळे शहराला पुराच्या धोक्याची शक्यता
 
हिमायतनगर(अनिल मादसवार)रेल्वेस्थानक रस्त्यावरील शहरालगत असलेल्या ओढ्यात बेश्रमाच्या झाडांनी आक्रमण केल्यामुळे संपूर्ण नाला बेश्रममय झाला आहे. हि बाब लक्षात घेता गतवर्षी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून नाला खोलीकरण व सरळी करणासाठी जवळपास १५ लाख मंजूर होऊनही अद्याप काम रखडल्याने वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यास अडथळा निर्माण होऊन, शहराला पुराचा मोठा धोका बसण्याची शक्यता बळावली आहे. करिता तातडीने कामास सुरुवात करून पावसाळ्यापूर्वी बेशरमास हटउन पाण्याचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी होत आहे.

हिमायतनगर शहर हे तेलंगाना - विदर्भाच्या सीमेवर आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या - जाण्याची नेहमीच वर्दळ असते, शहरात येणारा नांदेड - किनवट राज्य रस्त्यावरील मार्गावर मोठा ओढा आहे. याच ओढ्याच्या पुलावरून रेल्वे स्थानक, भोकर, हदगाव, नांदेडकडे जाण्याचा मार्ग आहे. येथील रेल्वे कोर्नर्वरिल ओढ्यात व संपूर्ण परिसराला बेश्रमाच्या झाडांनी व्यापले आहे. त्यामुळे नजर जाईल तिथपर्यंत बेश्रमाचीच हिरवीगार झाडे दिसत असून, याच नाल्याला पावसाळ्यात मोठापूर येउन संपूर्ण गावाला वेढा पडतो. याचा अनुभव सन २००६, २००८ च्या सालात झालेल्या अतिवृष्टीत वाहनधारक, नागरिक व शहरवासियांना आला होता. त्यावेळी तब्बल ५ ते ६ तास वाहतूक ठप्प झाली होती, तर अनेकांच्या घरात पाणी शिरून वाहने वाहून जाऊन मोठे नुकसान सुद्धा झाले होते. 

यास कारण ठरले ते बेश्रामाने व्यापलेला परिसर कारण त्यामुळे पावसाचे पाणी थेट ओढ्यातून वाहून जाण्याऐवजी संपूर्ण परिसरात पसरून सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. याच नाल्यात पाणी जमा राहून पुढे मार्ग नसल्याने शहरातील रहिम कॉलनी, उमर चौक, रुख्मिणी नगर, दत्तनगर परिसरातील नूतन वस्तीत शिरले होते. त्यामुळे तोच प्रकार एकदम येणाऱ्या अतिवृष्टीच्या पावसामुळे घडू शकतो. तेंव्हा आगामी काळात उद्भवणाऱ्या पावसाच्या पाण्यापासूनच शहराचा धोका टाळण्यासाठी जिल्हा  प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत जुन्या जानकारानि व्यक्त केली होती. हे लक्षात घेऊन तून व्यक्त होत आहे. विद्यमान आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी नियोजन समितीच्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित करून यासाठी १५ लाखाचा निधी मंजूर करून घेतला होता. त्यामुळे शहरवासीय व प्रवाशी वर्गातून संधान मानले जात होते, परंतु अद्याप नाला सरळीकरणाचे काम झाले नसल्याने कृषी विभागाच्या चालढकल कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

याबाबत तालुका कृषी अधिकारी बी.बी.दावलबाजे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, या कामास तांत्रिक मंजुरी मिळाली होती, त्यामुळे कामाचा शुभारंभ केला. परंतु प्रशासकीय मंजुरी मिळाली नसल्याने काम रद्द झाले आहे, सदरची कामे आमच्या कार्यालयामार्फत होणार नसून,  यासाठी लघु पाठबंधारे जलसंधारण विभागाच्या अधिकार्यांनी प्रस्ताव दाखल करून पाठपुरावा केल्यास हे काम मार्गी लागू शकते असे त्यांनी सांगितले.

शुभारंभ होऊन वर्ष लोटले.. काम मात्र झालेच नाही...!
--------------------------
जलसंधारण व कृषी विभागाच्या एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमातून जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पावसाची पाणी जमिनीत झिरपून पाणी पातळी वाढविण्यासाठी आणि रेल्वे स्थानकाला जाणार्या नागरिकांना दुर्गंधीपासून कायमची मुक्ती देण्यासाठी नाल्याची दुरुस्ती व बेशरमाचा वेढा काढण्यासाठी १५ लाखाचा निधी मंजूर झाला होता. याच निधीतून तालुका कृषी अधिकारी कार्यालय मार्फत नाला खोलीकरण व सरळीकरणाची जवळपास ३ मीटर खोली, ६०० मीटर लांबी आणि १३ मीटर रुंदीचे कामाचा शुभारंभ दि.१६ में २०१५ रोजी आ. नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते झाला होता. यावेळी नाला सरळीकरणाचे काम करताना आजू - बाजूच्या लोकांचे नुकसान होऊ नये याची दक्षता घ्यावी आणि काम तातडीने पूर्ण करून संभाव्य धोका टाळावा अश्या सूचना तालुका कृषी अधिकारी दावलबाजे, मंडळ कृषी अधिकारी जाधव, कृषी पर्यवेक्षक पवार, लखमोड यांना दिल्या होत्या. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी